अहमदनगर दि.३१ जानेवारी
अहमदनगर शहरामध्ये सध्या अवैद्य सावकारीचा खेळ तरुण मुलांच्या जीवाशी आला आहे म्हणतात ना तरुणपणाच्या उंबरठ्यावर काहीच कळत नसतं त्याचप्रकारे त्या तरुण मुलांना काही कळत नसल्याने अनेकजण अवैद्य सावकारीच्या आहारी गेल्याने त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत.
ऑनलाइन जुगार तसेच क्रिकेट सामन्यावरची सट्टेबाजी आणि मौज मजा करण्यासाठी तरुण सध्या अवैद्य सावकारीला जवळ करतात मात्र ज्या वेळेस पैसे देण्याची वेळ येते त्यावेळेस मुद्दल पेक्षा व्याज भरूनही पैसे भेटत नसल्याने आणि वसुली साठी सावकाराचे वसुलीसाठी ठेवलेले टोळके तरुणांच्या घरी रात्री अपरात्री जातात कुटुंबियांना धमकी देणे दुचाकी चारचाकी गाड्या असतील तर त्या घेऊन जाणे असे प्रकार सुरू होतात आणि अखेर घर सोडणे नाहीतर आत्महत्येचा पर्याय स्वीकारणे अशा दोनच गोष्टी या तरुणांसमोर राहतात आणि त्यापैकी एकाचा मार्ग तरुण स्वीकारत असल्याचे चित्र नगर शहरामध्ये दिसून येत आहे.
अनेक तरुण नगर शहर सोडून बाहेर वास्तव्याला गेले आहेत त्याचं प्रमुख कारण म्हणजे सावकारी मध्ये अडकलेली त्यांची चक्री.अवैद्य सावकारीचा व्याजाचा दर पाहून डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे दर तासा पासून दर दिवसापर्यंत महिन्यांपर्यंत वर्षापर्यंत असे विविध व्याजाचे दर आहेत हजार रुपये घेतले तर दर तासाला त्यामागे पन्नास रुपये द्यावे लागतात दिवसाला घेतले तर शंभर रुपये रोज आणि महिन्याला घेतले तर त्याचे व्याजदर घेणाऱ्यालाही लक्षात येत नाही. दिवस उलटला की त्या संपूर्ण रकमेवर पुन्हा दुसऱ्या दिवसापासून व्याज सुरू होते. त्यामुळे हजार रुपयाचे लाख रुपये कधी होतात हेच पैसे घेणाऱ्याला कळत नाही आणि त्यानंतर लागलेला तगादा कुटुंबात झालेली मानसिक घुसमट त्या मुळे काही कुटुंब आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी आणि समाजात प्रतिष्ठा राखण्यासाठी पैसे देतात मात्र त्यामुळे कुटुंब उध्वस्त झालेलं असतं.
“अवैध सावकारी व्याजदर
काहीही तारण न ठेवता – 1000 घेतले तर दार तासाला 50 रुपये व्याज जेवढे तास पैसे वापरले तेवढ्या तासाचे 50 रुपये प्रमाणे व्याज”
नगर शहरामध्ये अनेक तरुण मुले सध्या बाहेरगावी गेलेले आहेत या मागील कहानी पाहिले असता सुमारे पंचवीस लाखापासून पन्नास लाखापर्यंत व्याज भरूनही व्याज मुद्दल फिटत नसल्याने अखेर या तरुणांनी शहर सोडल आहे.
“अवैध सावकारी व्याजदर-काहीही तारण न ठेवता- आठवड्यासाठी पैसे घेतले तर 200 रुपये रोज तारण कर्ज(गाडी, सोन, चेक,)- महिन्याला 20 ते 30 टक्के पर्यंत”
या अवैध सावकारीला कुठेतरी आळा बसावा अशी मागणी आता समोर येत असून पोलीस प्रशासन सह निबंधक विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र ज्या नागरिकांची फसवणूक झाली आहे किंवा जे नागरिक अजूनही अवैद्य सावकारीत गुरफटलेले आहेत त्यांनी सुद्धा पुढे येऊन तक्रार करणार तेवढेच गरजेचे आहे. मात्र इज्जत की खातिर अनेक तरुण आणि त्यांचे कुटुंबीय पोलिसांमध्ये जाण्याची हिंमत करत नाही आणि त्यामुळेच अवैद्य सावकारीचे सध्या शहरात फुटले आहे.
या अवैध सावकारा पर्यंत पोहचवण्या साठी काही खास टोळी कार्यरत असते सावज गाठून त्याची माहिती गोळा करून ते अवैध सावकारा पर्यंत पोहचवण्यासाठी त्या टोळीला चांगला मोबदला मिळतो आणि त्यातूनच व्याजाचे चक्र फिरत राहते
या अवैध सावकारीला चोरी छुपे राजकीय पाठबळ तर असतेच तसेच गल्ली दादा,टोळक्याचा प्रमुख,आशा लोकांचे पाठबळ असते.