Homeशहरअहमदनगर शहराचा कचरा प्रश्न पुन्हा पेटणार बुरुडगावकारांनी ठोकले मनपाच्या कचरा डेपोला टाळे

अहमदनगर शहराचा कचरा प्रश्न पुन्हा पेटणार बुरुडगावकारांनी ठोकले मनपाच्या कचरा डेपोला टाळे

advertisement

अहमदनगर दि ५ एप्रिल

बुरुडगावच्या हद्दीत अहमदनगर महानगर पालिकेचा कचरा डेपो असून या डेपोचा प्रश्न काही न काही कारणांनी नेहमीच चर्चेत असतो

मंगळवारी बुरुडगाव ग्रामस्थांनी महापालिकेच्या कचरा डेपोला टाळे ठोकले असून त्या मुळे शहरातील कचरा प्रश्न पुन्हा पेटणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.

भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी २०१९ मध्ये महापालिकेच्या महासभेत सावेडी कचरा डेपो बंद करण्याचा निर्णय घेतला होता त्या नंतर सर्व कचरा पुन्हा बुरुडगाव कचरा डेपोत जात होता.

त्या वेळी बुरुडगाव ग्रामस्थांनी या कचरा टाकण्याला विरोध केला होता मात्र त्या नंतर काहो अटीवर बुरुडगाव ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास परवानगी दिली होती बुरूडगावला पाणी, पथदिवे व रस्ते देण्याचे महापालिकेने मान्य केल्याने बुरूडगावमधील सत्ताधारी व नागरिकांनी बुरूडगावमधील कचरा डेपोच्या विस्ताराला मान्यता दिली होती.

मात्र त्यानंतर महापालिकेने बुरुडगाव ग्रामस्थांना दिलेली अश्वासने पाळली नाहीत मागील काही वर्षात महानगरपालिकेने ना पाणी दिले ना रस्ते दिले ,ना पथदिवे दिले त्यामुळे बुरुडगावचे ग्रामस्थ संतप्त झाले असून बुरुडगाव ग्रामस्थांनी आता कचरा डेपोला टाळे ठोकले असून महानगर पालिकेने दिलेल्या आश्वासनांची जोपर्यंत पूर्तता होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे बुरुडगाव ग्रामस्थांनी सांगितले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular