अहमदनगर दि २४ फेब्रुवारी
सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर भारतातील अनेक नागरिक आणि विद्यार्थी पुन्हा भारतामध्ये परतू लागले लागले आहेत अहमदनगर मधील काही विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये अडकले असून त्यांनी काही व्हिडिओ त्यांच्या नातेवाईकांना पाठवले आहेत सध्या त्यांच्या कॉलेज कँपस मध्ये वातावरण शांत असलं तरी भारतामध्ये परतण्यासाठी ते सरकारशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी या व्हिडिओद्वारे आपल्या नातेवाईकांना कळवले आहे साक्षी बोराटे आणि योगिता काळे यांनी आपली प्रतिक्रिया आपल्या नातेवाईकांना व्हिडिओ दारे पाठवले आहे.
युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचे नातेवाईक सध्या चिंतेत असून आमच्या मुलांना लवकरात लवकरhttps://youtu.be/4VNKMkcdimE भारतामध्ये सुरक्षित परत आणावे अशी विनंती त्यांनी भारत सरकारला केली आहे.कारण युक्रेन मध्ये सध्या परिस्थिती गंभीर असून काही विद्यार्थ्यांचे एटीएम कार्ड चालत नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे
पहा व्हिडीओ👇