अहमदनगर दि.२१ मार्च – (सुशील थोरात)
अहमदनगर शहर काना मात्रा नसलेले ऐतिहासिक शहर आहे. सहनशील नगरकर म्हणून नागरकरांची ओळख आहे.याचाच फायदा घेऊन काही गुंड शहारत नवीन ताबा मारण्याचा प्रकार अमलात आणत आहेत
मात्र म्हणतात ना भगवान के घर देर है अंधेर नहीं त्या नुसार या ताबा गुंडांच्या विरोधात एल्गार होणार हे नक्की नगरच्या पाण्यात भल्या भल्याना चितपट करण्याची ताकत आहे यासाठी आता अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी नगरकर पुढे येतीलच.
ताबा प्रकरणात एक गोष्ट प्रकर्षणाने जाणवली ती म्हणजे हे सर्व ताबा मारणारे गुंड आहेत ते कोणत्या ना कोणत्या राजकीय पुढाऱ्यांच्या छत्रछाये खाली वावरत असतात आजकाल फोटो काढणे इतके सोपे झाले आहे की मोबाईलवर एक मिनिटात फोटो काढून लाखो लोकांपर्यंत काही मिनिटात पोहचतो याचाच फायदा हे ताबा मारणारे गुंड घेत असतात राजकीय पुढाऱ्यांबरोबर फोटो काढून सोशल मीडिया असेल किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या बोर्डवर छापला की झाले यांचे काम भले त्या राजकीय पुढाऱ्याला माहित नसते की हा कार्यकर्ता काय करतोय मात्र राजकीय पुढाऱ्याच्या फोटोचा वापर करून तो कार्यकर्ता सामान्य लोकांवर दहशत करतो हे सत्य आहे. त्यामुळे आता राजकीय पुढाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून आपली भूमिका विशद करणे गरजेचे आहे अन्यथा नागरिक त्यांच्याकडे संशयाने पाहू शकतात.
शहरात अजून एक पद्धत सुरू आहे ती म्हणजे जुने पुराणे कागदपत्र शोधून काढणे त्याच्या आधारे एखादी नोटीस जागा मालकाला पाठवणे आणि त्या पन्नास-साठ वर्षांपूर्वीच्या कागदपत्राच्या आधारे प्लॉट धारकाला मानसिक त्रास देऊन त्याच्याकडून काही रक्कम हडप करणे. तर दुसऱ्या प्रकारात एखाद्या मोकळ्या प्लॉट मध्ये रात्रीतून एखाद्या दगडाला शेंदूर फासून धार्मिक भावने खाली त्या प्लॉटची किंमत कमी करणे तो शेंदुर फासलेला दगड हटवण्यासाठी लाखो रुपयांची रक्कम घेणे हे प्रकारही नगर शहरात घडले आहेत आणि घडत आहेत.
नगर शहरातील हे भाई,दाद,साईराम,मेम्बर अण्णा,चाचा,यांच्यातील काही ताबा माफिया राजकीय प्रवाहात आहेत आणि तेच सामन्य नागरिकांच्या काबाडकष्ट करून मिळवलेल्या जमिनी घरांवर डोळे ठेऊन हडप करण्याच्या मार्गावर आहे आणि विशेष म्हणजे या गोष्टी कुठेही लपून राहिलेल्या नाहीत सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना या गोष्टी माहीत असतात मात्र आपण त्याला विरोध केला तर तो गुंड दुसऱ्या कडे जाईल या भीतीने राजकीय पुढारीही या गुंडांना काही बोलत नाही आपल्या छोट्या फायद्यासाठी राजकीय पुढारी अशा छोट्या गुंडांना नकळत मोठं करत असल्याचे चित्र नगर शहरात पाहायला मिळते त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी अशा गुंडांना खड्यासारखे बाहेर काढणे गरजेचे आहे अन्यथा एकेदिवशी हेच ताबा गुंड या राजकीय पुढाऱ्यांची डोकेदुखी ठरणार आहे.
वाचत राहा सावेडी उपनगरातील ताबा माफिया आणि त्यांचे कारनामे