अहमदनगर दि १८ फेब्रुवारी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी परिसरातील सहयाद्री चौकात एक अनोखं दृश्य पाह्यला मिळत होत. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जाती भेद केला नाही तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विश्वासू सहकार्यांमध्ये अनेक मुस्लिम सरदार होते स्वराज्य उभारणीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून अनेक मुस्लिम सरदारांनी भगवी पताका फडकावल्याचा इतिहास आहे.
आणि तो इतिहास आज नगर शहरात पुन्हा एकदा 21 व्या शतकात पाहायला मिळालं उस्मानाबाद तालुक्यातील परंडा येथील रमजान मदारी यांचं मुस्लिम कुटुंब आपल्या उदरनिर्वाहासाठी दरवर्षी नगरमध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या आधी भगवे ध्वज विकण्याचं काम करते.
रमजान मदरी त्यांचे भाऊ आणि मुले दरवर्षी नगर शहरातील भगवे ध्वज विक्री करण्यासाठी येत असतात अमदनगरसहऔरंगाबाद, बीड,उस्मानाबाद या ठिकाणी त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या आधी भगवे ध्वज विक्रीचे काम करत आहेत.
पठाणी ड्रेस वर डोक्यावर टोपी दाढी वाढलेली आणि हातात भगवा झेंडा हे चित्र पाहून अनेक जण या ठिकाणी थांबतानाच चित्र आज दिसत होतं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला स्वराज्य म्हणजे सर्वधर्म समभाव हे या दृश्यातून समोर येत होत.