अहमदनगर दि.२ जानेवारी
नगर शहर आणि शहरातील रस्ते आणि खड्डे यांचे एक समीकरण जुळल आहे नगर शहरात आजमितीला अनेक मुख्य रोड खड्ड्यांनी व्यापलेले आहेत.नगर शहरात भुयारी गटार योजना फेज टू तसेच इतर विविध विकास कामे सुरू असल्यामुळे शहरातील अनेक रस्ते खोदून ठेवलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण शहर खड्डेमय झाले आहे किमान नवीन वर्षात तरी नगर शहर खड्डेमय मुक्त व्हावे अशी ईच्छा नगरकरांची असून याबाबत आता महानगरपालिकेने जी कामे रेंगाळले आहेत ती वेगाने करून किमान नवीन वर्षात तरी नगरकरांना खड्डेमुक्त रस्ते द्यावेत अशी मागणी नागरकरांनी केली आहे.
नगर शहरातील खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना पाठीचे,मणक्याचे दुखणे सुरू झालेले आहे. तसेच खड्ड्यांमुळे अपघात झाल्याने अनेक नागरिक जायबंदी झालेले आहेत. तसेच वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यामुळे एकंदरीत नागरिक या खड्ड्यांमुळे खूप त्रस्त आहेत.
पुढील पन्नास वर्षांचे नियोजन करून नगर शहरातील रस्त्यांचे काम सुरू असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले आहे. मात्र खरंच पुढील पन्नास वर्ष टिकतील का ही शंका नगरकरांना आहे कारण रस्त्याची जी कामे सध्या पूर्ण झालेले आहेत त्या कामांचा दर्जा पाहून पुढील पाच वर्षे जरी हे डांबरीकरण टिकलं तर नगरकरांवर उपकार होतील अशी भावना या परिसरातील नागरिकांनी बोलून दाखवली आहे. अत्यंत दर्जाहीन काम सध्या सुरू असल्याने जनतेचे पैसे खड्ड्यात चाललेत अशीच परिस्थिती नगर शहरातील काही कामावरून दिसून येत आहे. किमान नवीन वर्षे तरी दर्जेदार आणि चांगले रस्ते मिळावेत हीच नागरकरांआज इच्छा आहे.