Home जिल्हा खबरदार लसीचे दोन्ही डोस घेतल्या नसतील तर आता गोष्टीवर येणार निर्बंध प्रशासन...

खबरदार लसीचे दोन्ही डोस घेतल्या नसतील तर आता गोष्टीवर येणार निर्बंध प्रशासन उचलणार हे कठोर पाऊल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्या सूचना

अहमदनगर दि.१८ डिसेंबर
अहमदनगर जिल्ह्यात जवळपास नऊ लाख नागरिकांनी कोरोनाचे एकही डोस घेतला नसल्याची धक्कादायक माहिती खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री हसनमुश्रीफ यांनी दिली आहे.तर पाच लाख नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही नागरिक डोस घेत नासल्याने आता प्रशासनाने कठोर पाऊल उचलणार आहे कोरोना लसीचा एकही डोस न घेणाऱ्या नागरिकांना आता पेट्रोल, रेशन तसेच इतर सुविधांपासून मुकावे लागणार आहे त्यामुळे आता पेट्रोल पंप वर गेल्यावर अथवा रेशन दुकानात गेल्यावर अथवा प्रशासनाच्या काही सेवांचा लाभ नागरिक घेत असतील तर त्यांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करण्यात लागणार आहे याबाबत ालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकार्‍यांना तशा सूचना दिल्या आहेत नगर जिल्ह्यात उद्यापासून या कारवाईला सुरूवात होणार आहे.

पहा व्हिडीओ👇

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version