HomeUncategorizedचांदा येथील चोरट्यांचा मारहाणीत मृत्यू झालेल्या ओमकारचा प्राण वाचला असता जर...

चांदा येथील चोरट्यांचा मारहाणीत मृत्यू झालेल्या ओमकारचा प्राण वाचला असता जर ग्रामसुरक्षा यंत्रणा सूरु असती देयके न भरल्याने ग्राम सुरक्षा यंत्रणा झाली होती ठप्प

advertisement

नेवासा दि३ मार्च

चेन्नई येथे कृषी शिक्षण घेऊन भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या ओमकार कर्डिले या तरुणाचा चोरट्यांच्या मारहाणीत दुर्दैवी मृत्यू ही मनाला हळहळ करणारी घटना चांदा लोहारवाडी रस्त्यावरील कर्डीले वस्तीवर घडली. मात्र या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत कोण असा सवाल उपस्थित होतोय.

जिल्हा पोलीस दलात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशन मध्ये काही मोजक्या कर्मचाऱ्यांवर पोलीस स्टेशनचा कारभार सुरु आहे. सध्याच्या काळात लोकवस्ती झपाट्याने वाढल्यामुळे त्या प्रमाणात पोलिसांची संख्या अत्यंत नगण्य आहे त्यामुळे चोऱ्या दरोडे रोखण्यात पोलिस कुठेतरी अपयशी ठरत असताना पोलिसांनी ग्राम सुरक्षा यंत्रणा सुरू केली आहे. त्याच्यामुळे पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यापर्यंत चोर आल्याचा संदेश पोहोचवून लवकरात लवकर त्या व्यक्तीला मदत मिळू शकते.

जी यंत्रणा चांदा गावातही सुरू करण्यात आली होती मात्र या ग्राम सुरक्षा यंत्रणेची देयके ग्रामपंचायत थकवली असल्याने ग्रामसुरक्षा यंत्रणा ठप्प झाली होती जर ग्रामपंचायतीने देयके भरली असती तर कदाचित बुधवारच्या घटनेत ओमकार कर्डिले या युवकाचा मृत्यू टळला असता अशी माहिती नेवासा पोलिसांकडून मिळतेय.

कारण पोलीस प्रत्येक ठिकाणी लवकरात लवकर पोहोचू शकत नाही मात्र आजूबाजूची ग्रामस्थ कदाचित पोहचले असते म्हणूनच अशी ग्राम सुरक्षा यंत्रणा पोलिसांनी सुरू केली आहे मात्र तरीही अशा महत्त्वाच्या गोष्टीकडे जर ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असेल तर अशा गंभीर घटना घडल्यानंतर गाव बंद ठेवून उपयोग होणार नाही.

भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या ओमकार चा मृत्यू आणि त्याच्याबरोबरच त्याच्या घरातील दोन जण गंभीर जखमी झाले या सर्व घटना तर ग्राम सुरक्षा यंत्रणा सुरु असत्या तर कदाचित टाळल्या गेल्या असत्या मात्र या गंभीर गोष्टीकडे कुणीही अद्यापही लक्ष दिले नाही पोलिसांचा निषेध करण्यापेक्षा या गंभीर गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

ग्राम सुरक्षा यंत्रणा चांदे गावात पोलीस दलाने सुरू करून दिली होती. परंतु देयके ग्रामपंचायतने न भरल्यामुळे ग्राम सुरक्षा यंत्रणेची सेवा बंद आहे ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर तात्काळ केला गेला असता तर युवकाचे प्राण वाचविणे शक्य झाले असते…नेवासा पोलीस

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular