अहमदनगर दि.६ फेब्रुवारी
अहमदनगर शहरातील माळीवाडा बस स्टँड शेजारी नगर पुणे रोडवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नूतनीकरणाचा अनावरण करण्यात आलं.
गेल्या काही दिवसांपासून शहरात बोर्ड लावून या कार्यक्रमाबाबत जहीरात करण्यात आली होती. मात्र हा कार्यक्रम नेमका काय असेल याबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात अली असल्याने शिवप्रेमींना या दिवसाची मोठी उत्सुकता लागली होती हजारो तरुण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पाहण्यासाठी उपस्थित होते.तरुणांमध्ये प्रचंड उत्साह जाणवत होता अनेक तरुण भगवे ध्वज घेऊन कार्यक्रमस्थळी येत होते छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांणी सर्व परिसर दुमदुमून गेला होता.
अहमदनगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नुतनीकरण केलेल्या पूतळ्याचे अनावरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या प्रमाणेच धर्मवीर संभाजी महाराज आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामनवांचे पूर्णकृती पुतळे लवकरच शहरात उभारणी करणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.
अहमदनगर शहराच्या प्रथम नागरिक महापौर रोहिणी शेंडगे यांच्यासह शिवसेनेच्या नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. अखंड हिंदू समाजातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असे सांगण्यात येत होते.
आयोजकांनी कार्यक्रम अत्यंत देखना केला मात्र कार्यक्रम संपल्यानंतर हिंदी चित्रपटातील हिडीस गाणी लावली त्यामुळे या कार्यक्रमाला गालबोट लागलं आहे कारण या कार्यक्रमाला अनेक महिला मुली आपल्या कुटुंबीयांसमवेत या ठिकाणी आल्या होत्या मात्र चुम्मा चुम्मा दे दे असे गाणे लावून या अशा अत्यंत चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. अशा हिडीस गाण्यावर तरुणांनी नाच केला खरा मात्र यामुळे छत्रपती शिवरायांच्या विचारांना कुठेतरी तडा गेला होता आयोजकांनी या कार्यक्रमात पोवाडे अथवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाथा लावल्या असत्या तर निश्चितच या चांगल्या कार्यक्रमातुन एक वेगळे वातावरण याठिकाणी निर्माण झाले असते.
मात्र मध्येच काही हिंदी चित्रपटातील विचित्र गाणे लावून त्यावर तरूण नृत्य करत असल्यामुळे अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली त्या देखण्या कार्यक्रमाला अशा चुकीच्या गाण्यांमुळे गालबोट लागलं हे नक्कीच.
हे असले गाणे दाखवतात, श्री छत्रपती शिवाजी महाराज चा…. फक्त कार्यक्रम करण्यापेक्षा श्री शिवाजी राजे सारखे आदर्श वर्तन नागरिकां कडून झाले पाहिजे, ते खरे मावळे आणि कामे झाली पाहिजे.. आख्या नगरची वाट लागली आहे…