Homeक्राईमटोपे साहेब बारावा बळी गेला अजून तुमची चौकशी चालूच का? बारा निष्पाप...

टोपे साहेब बारावा बळी गेला अजून तुमची चौकशी चालूच का? बारा निष्पाप लोकांना कधी भेटणार न्याय… दहा दिवस झाले अजून चौकशी सुरूच

advertisement

अहमदनगर प्रतिनिधीI

याअहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयामधील कक्षास आग लागून 11 जणांचा बळी गेला होता तर या कक्षातील सहा रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते त्यामधील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे लक्ष्मण सावळकर असे मयत झालेल्या बाराव्या रुग्णाचे नाव आहे .सहा नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती तर आठ नोव्हेंबर रोजी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन या प्रकरणात एक चौकशी समिती नेमली असल्याची घोषणा केली होती ही चौकशी समिती आठ दिवसात आपला अहवाल सादर करेल आणि यामध्ये जे दोषी असतील त्यांना आम्ही सोडणार नाही अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली होती मात्र आज बारावा बळी गेला दहा दिवस उलटून गेले तरी ही चौकशी चालूच आहे तर या प्रकरणी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये प्रथम अज्ञात लोकांनी विरोधात गुन्हा नोंदवला होता त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह चार परिचारिकांना अटक केली होती सध्या हे सर्व न्यायालयीन कोठडीत आहेत मात्र चौकशी समितीचा अहवाल कधी येणार आणि या घटनेला जबाबदार असलेल्या खऱ्या गुन्हेगारारपर्यंत पर्यंत पोलीस आणि चौकशी समिती पोहोचणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular