Homeजिल्हादोन वर्षा नंतर छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी दुपारी चार नंतर...

दोन वर्षा नंतर छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी दुपारी चार नंतर निघणार मिरवणूक मात्र पोलिसांनी बजावल्या मंडळांना नोटिसा

advertisement

अहमदनगर दि १९ फेब्रुवारी
आज तारखेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अहमदनगर शहरात उत्साहाने साजरी होत आहे
गेले दोन वर्ष करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे जयंती धुमधडाक्यात साजरी झाली नाही परंतु यंदा जयंती जल्लोषात साजरी होत आहे.

नगर शहरात अनेक ठिकाणी चौकाचौकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमा असलेले भव्य ध्वज चौका चौकात लावण्यात आले असून अनेक दुचाकी चारचाकी वाहनांवर ध्वज लावण्यात आले असल्याने वातावरण भगवेमय झाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे पोवाडे लावल्यामुळे वातावरण शिवमय झाल्याचं दिसून येतंय छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त काही मंडळ चार वाजल्या नंतर नगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून मिरवणूक काढणार आहेत मात्र मिरवणुकीवर बंदी असल्याने पोलीस प्रशासनातर्फे मिरवणूक काढू नये म्हणून मंडळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र तरीही शहरातील पाच मंडळ मिरवणूक काढणार असून कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत चार तर तोफखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एक मंडळ मिरवणूक काढणार असल्याची माहिती मिळावी असून केडगाव मध्ये सुद्धा एक स्वतंत्र मिरवणूक निघणार आहे पोलिसांनी या मिरवणुकीसाठी बंदोबस्त तैनात केला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular