Homeविशेषनगर शहरातील गोवंशीय कत्तलखाने का बंद होत नाहीत ? शहरातील नाल्यांमध्ये डोकावून...

नगर शहरातील गोवंशीय कत्तलखाने का बंद होत नाहीत ? शहरातील नाल्यांमध्ये डोकावून पहा कसे वाहतायेत रक्ताचे पाट

advertisement

अहमदनगर दि.७ फेब्रुवारी

1995 साली युती सरकारच्या काळात गोवंश हत्या बंदी कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला होता त्या नंतर पंधरा वर्षानंतर 2 मार्च 2015 साली राष्ट्रपतींनी या वर स्वाक्षरी केल्या नंतर हा कायदा अमलात आला आहे त्या नंतर सुद्धा गो वंशीय जनावरांची कत्तल थांबलेली नाही.

अहमदनगर शहरामध्ये दर पंधरा दिवसांनी काही ठरावीक हद्दीमध्ये छापा पडतो आणि कत्तली साठी आणलेली गोवंश जनावरे सोडली जातात ती जनवरे पुढील संगोपनासाठी काही गोपालन संस्थेच्या ताब्यात दिली जातात पुन्हा पंधरा दिवसांनी असा छापा पडतो पुन्हा तेच प्रकार घडतो मात्र हे होत असताना संगमनेर सारखी अहमदनगर शहरात कारवाई का होत नाही असा प्रश्न आता गोवंशीय रक्षक करत आहेत

संगमनेर मध्ये अनेक वेळा छापे पडले मात्र तेथील गोवंश कत्तलखाणे काही बंद होत नव्हते त्यामुळे पोलिसांनी सर्जिकल स्ट्राइक करून त्या ठिकाणी हा व्यवसाय समूळ नष्ट करण्यासाठी कठोर पावले उचलली आणि काही अंशी पोलीस यंत्रणेला यश आले आहे मात्र अहमदनगर शहरात असं काही होत नाही कारण जर आपण जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नाले कधी डोकावून पाहिले तर येथे चोवीस तास रक्ताचे पाणी वाहताना आपल्याला दिसून येत मात्र हे कोणाच्या कसं लक्षात येत नाही हे एक आश्चर्य आहे.

या गटारी मधून जाणारे जनावरांच्या मांसाचे तुकडे यामुळे अनेक वेळा याठिकाणी नाल्या तुंबल्या आहेत तर हेच पाणी पुढे सरस नगर भागात जाते त्यामुळे तेथील नागरिकांचे आयुष्य धोक्यात येण्याची चिन्हे आहेत बारा महिने चोवीस तास या ठिकाणाहून रक्ताचे पाट वाहत असताना येथे कत्तलखाने बंद आहेत हे आपण कसे समजावे

याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होते आहे का ? का यामागे कोणाचा वरदहस्त आहे हे शोधणे ही महत्त्वाचे आहे कारण कत्तलीसाठी येणारे जनवारे काही छोटे नसतात त्यामुळे हा प्रकार लपून राहू शकत नाही तरीही हे रक्ताचे पाट कसे वाहतात हे एक मोठे आश्चर्य आहे.

गोवंश रक्षणासाठी काही संघटना मध्यंतरीच्या काळात खूप आक्रमक झाल्या होत्या मात्र त्या अचानक पणे शांत का झाल्या हा एक मोठा प्रश्न आहे अनेक वेळा छापा पडूनही त्याच ठिकाणी पुन्हा कत्तलखाने सुरूच कसे होतात याबाबत आता गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

पोलिसांनी ठरवलं तर काहीही होऊ शकतं असं बोललं जातं मग नगर शहरातील चोरीछुपे चालणारे कत्तलखाने का बंद होत नाही ? क्रमशः

वाचत राहा अखो देखा – कसा चालतो गोवंशीय जनावरांच्या कत्तलीचा व्यापार, कुठून आणि कसे येतात जनावरे आणि कुठे पुरवले जाते हे मांस,कशी होते आर्थिक उलाढाल कोण आहेत याचे पडद्याआडचे चेहरे…

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular