अहमदनगर दि.३१ डिसेंबर
नवीन वर्षात प्रवेश करताना जुन्या कडू आठवणी सोडून द्यायच्या असतात मात्र त्याची चर्चा तर होतच राहणार थंडीच्या दिवसात नवीन वर्षात जाता जाता काही गरमा गरम चर्चा तर होताच राहणार.
अहमदनगर मध्ये सध्या सोशल मीडिया वर अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत काही राजकीय काही अराजकीय त्याचप्रमाणे शहरातील नेत्यांना निनावी पत्रही आल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे. पत्र फक्त नेत्यांनाच नव्हे तर काही पत्रकारांना सुद्धा आली आहेत. मात्र ती धमकीची नव्हे तर एकमेकांवर टीका करण्याची त्यामुळे सध्या या पत्रांची नगर शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे चर्चा टोल नाक्या जवळील एका हॉटेलची होत आहे, चर्चा त्या गोळीबाराची होत आहे. चर्चा अत्याचार प्रकरणातील सोशल मीडियावर झालेल्या चॅटिंगची होत आहे,आणि चर्चा खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांची होत आहे, अशा अनेक चर्चा नगर शहरात सुरू आहेत मात्र त्या किती खऱ्या किती खोट्या या याबाबत कसलाही पुरावा नाही. मात्र विविध कट्ट्यांवर विविध चर्चा खमंगपने सुरूच आहेत.
बदलीचे पैसे घेऊन लोकांना फसवणारी ती महिला कोण? राजकारणामध्ये एकमेकांचा काटा काढण्यासाठी पोटनिवडणुकीचा कसा उपयोग झाला? टोल नाक्यावर कोण कोणाला घेऊन जातंय? अत्याचार प्रकरणी कोण कोणाला मेसेज करतय ! शहरातील एका मोठ्या पॅलेसमध्ये बदलीच्या पैशांवरून कोण कोणाची हमरीतुमरी झालीय.?जमिनीचे खोटे कागदपत्र रंगवून कोण कोणाला लुटतंय अशा अनेक खमंग चर्चा फोडणी लावून सध्या काट्याकाट्यांवर सुरू आहेत.