Home शहर बाजारपेठेतील पथविक्रेत्यांनी आता केली शहरातील “या” जागेची मागणी आता तरी पथविक्रेत्यांचा व्यवसायाचा...

बाजारपेठेतील पथविक्रेत्यांनी आता केली शहरातील “या” जागेची मागणी आता तरी पथविक्रेत्यांचा व्यवसायाचा प्रश्न सुटणार का ?

अहमदनगर दि ६ एप्रिल (सुथो)
अहमदनगर शहरातील मुख्य कापडबजारा मध्ये दुकानासमोर हातगाडी गाडी लावण्यावरून पथविक्रेता आणि व्यपऱ्याचे भांडण झाले होते पुढे हे सुथोप्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले विविध राजकीय पक्षांनी आपापली भूमिका या प्रकरणात मांडली होती.

भांडणाच्या घटने नंतर बाजार पेठेतील सुतकअतिक्रमणांचा मुद्दा चांगलाच पेटला होता अतिक्रमण हटाव साठी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी उपोषणही सुरू केले होते मात्र महानगरपालिकेने सुथोअतिक्रमण होऊ देणार नाही असे आश्वासन दिल्यामुळे व्यापार यांनी उपोषण मागे घेतले होते.

मात्र आता काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर पथक विक्रेत्याला बसण्यास हरकत नाही असा ना हरकत दाखला त्या विक्रेत्याला दिला आहे सुथो जवळपास चाळीस ते पन्नास दाखले पथविक्रेत्यांनी महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे दाखल केले आहेत.

मात्र अद्यापही या पथविक्रेत्यांचा प्रश्न सुटलेला नाही मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्याबरोबर हॉकर्स युनिटी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष साहेबान जाहागीदार यांनी दोन वेळा सुथो बैठक घेतली मात्र अद्यापही हा प्रश्न निकाली निघाला नाही कल्याण रोडवरील एक जागा महानगरपालिका आयुक्तांनी सुचवली आहे मात्र ही जागा शहरा पासून खूप दूर होत असल्याने विक्रेत्यांनी ही जागा घेण्याची मान्य केले नाही.

मुख्य बाजारपेठेत शेजारी असलेल्या गंज बाजारामधील भाजी मंडईची जागा देण्यात यावी अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे सुथो ही भाजी मंडईच्या आवारात थोडेच भाजी विक्रते बसत असल्याने या ठिकाणची साफसफाई करून स्वखर्चाने काही सुशोभिकारण करून आम्ही त्या ठिकाणी बसू शकतो अशी तोंडी मागणी पथविक्रेत्यांनी आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version