अहमदनगर दि.१८ जानेवारी
अहमदनगर जिल्ह्यात सध्या बिंगो नावाचा जुगार जोरात सुरू आहे बिंगो या जुगारावर बंदी असली तरी चोरीछुपे म्हणता म्हणता खुलेआम शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बिंगो जुगार फोफावला आहे. काही मिनिटात लाखो रुपयांची कमाई मिळवणाऱ्या या बिंगो जुगार यामुळे अनेक तरुण कर्जबाजारी झाले आहेत आणि अखेर पैसे संपल्यानंतर अखेरचा मार्ग म्हणून आत्महत्येचा मार्ग काही तरुण स्वीकारत आहेत. त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊन अनेक लहान मुलं निराधार होत आहेत असे चित्र जिल्ह्यात विविध ठिकाणी पाहायला मिळतय.
मात्र हा जुगार दिसायला जरी छोटा असला तरी लाखो रुपयांची उलाढाल या बींगो जुगाराच्या माध्यमातून जिल्ह्यात होत असते. डबल पैसे कमावण्याच्या नादात तरुण बिंगो जुगारात फसत जातो आणि अखेर त्याला आत्महत्येशिवाय पर्याय उरत नाही.विशेष म्हणजे वीस तीस तीस लाख रुपयांची उधारी मालक जुगार खेळणाऱ्या ग्राहकांना देत असतो आणि मग त्याची वसुली नंतर पठाणी पद्धतीने सुरू होते आणि या वैतागला कंटाळूनच ग्राहक आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो.
बिंगो जुगारावर बंदी असली तरी हा चालू कसा आहे हा प्रश्न आता समोर येत असून आज पर्यंत किती बिंगो जुगार चालकांवर कारवाई झाली आहे अथवा किती बिंगो जुगार चालवणाऱ्या मालकांना पोलिसांनी अटक केली. यावरूनच या बिंगो चालकांना अभय असल्याचं दिसून येत आहे.
जर तरुण पिढी वाचवायची असेल तर लवकरात लवकर असे बिंगो जुगार चालवणाऱ्या दुकानावर छापे घालून जुगार चालवण्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अनेक तरुणांचे संसार उध्वस्त करणार्या बिंगो जुगार पोलिसांनी कारवाई करावी अन्यथा पुढील पिढी बरबाद होऊ शकते.
त्याचप्रमाणे क्रिकेटचा सट्टा हा ऑनलाईन पद्धतीने सुरू झाल्याने या सट्टा बाजारातही अनेक तरुण कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे आता पोलिसांना बिंगो जुगार बंद करण्याबरोबर ऑनलाइन चालणाऱ्या सट्टा बाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
“बिंगो जुगार चालवण्यासाठी जास्त जागा लागत नसल्याने एखाद्या छोट्या पत्र्याच्या टपरीत कोणत्याही रस्त्याच्या आडबाजूला हा जुगार चालू असतो एकट्या पाईपलाईन रोडवर सात ते आठ ठिकाणी हा जुगार चालू असल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे ग्राहकाकडे पैसे संपले तर याठिकाणी दहा ते पन्नास टक्क्यांपर्यंत व्याजाने पैसे देणारे सावकार उपलब्ध असतात. तर काही सावकार दर तासाला दहा टक्के व्याजाने पैसे देतात त्यामुळे ही रक्कम अव्वाच्या सव्वा जुगार खेळणाऱ्या ग्राहकांकडून नंतर वसूल केली जाते त्यामुळेच अनेक तरूण आत्महत्येच्या मार्गाला लागले आहेत.”