Home जिल्हा बोगस आणि खोटी कागदपत्रे तयार करून घरावर बोजा चढवणाऱ्या पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह तलाठी...

बोगस आणि खोटी कागदपत्रे तयार करून घरावर बोजा चढवणाऱ्या पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्यावर कारवाई साठी शेतकऱ्याचे प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

अहमदनगर दि.२५ जानेवारी

बोगस व खोटी कागदपत्रे करुन त्या आधारे शेतक-याच्या
राहात्या घरावर तलाठी ज्ञानदेव हनुमंत वेल्हेकर, मंडल अधिकारी श्रीनिवास आव्हाड तसेच लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थपकांनी संगनमत करुन बोजा चढविल्याबाबत अनेक वेळा तक्रार करूनही संबंधित लोकांवर कारवाई केली जात नसल्याने शेतकरी असलेल्या दिलीप राख यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला असून २६ जानेवारी पासून दिलीप राख आणि त्यांचे कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास बसणार आहेत.

दिलीप राख यांच्या मालकीच्या घरावर जी बोगस नोंद करण्यात आली आहे त्याबाबत माहिती अधिकारात सर्व कागतपत्रे मागवून खात्री करून आपल्या घरावरील कर्जाचा बोजा हा खोटे कागदपत्र तयार करून चढवला असल्याचे लक्षात आल्या नंतर दिलीप राख यांनी जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांच्या कडे रितसर तक्रार करून न्याय मिळावा म्हणून मागणी केली होती मात्र अनेक अर्ज व तक्रारी करूनही त्यांना अद्याप न्याय मिळला नाही.

त्याबाबत सर्व पत्रव्यवहार 2020 पासून सुरू आहे मात्र आज पर्यंत दिलीप राख याना उडवा उडवीची उत्तरे मिळत असल्याने आणि विनाकारण मानसिक शाररिक छळ होईल अशी वागणूक देत असल्याने न्याय मिळे पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालया समोर बसण्याचा इशारा दिला आहे या बाबत दिलीप राख यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना सविस्तर निवेदन देऊन गेल्या दोन वर्षात तलाठी कार्यालय, तहसिलदार, मंडल अधिकारी यांच्या कार्यालयात कशा प्रकारे उडवा उडवीची उत्तरे आणि कागदपत्रांचा खेळ करून विनाकारण मानसिक त्रास दिला त्याबद्दल तक्रार केली आहे.

त्यामुळे आता देशाच्या प्रजासत्ताक दिनी  शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी त्यांनी पालकमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिले असून दिलीप राख 26 जानेवारीला कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version