अहमदनगर दि.१६ जानेवारी
अहमदनगर जिल्ह्यात सध्या सर्व पोलीस ठाण्यांची वार्षिक तपासणी सुरू असून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर स्वतः तपासणी करून कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आहेत.सर्वात चॅलेंजिंग आणि महत्वाचे काम सुरू असणाऱ्या भरोसा सेल पोलीस ठाण्यात भेट देऊन कामाबद्दल माहिती घेतली त्या ठिकाणी असलेल्या अधिकारी कर्मचारी आणि समस्या घेऊन आलेल्या नागरिकांशी संवाद साधला.
भरोसा सेलने सण २०११ मध्ये एकूण २१८३ तक्रारी अर्जापैकी ७८९ कुटुंबामध्ये समुपदेशन करून समझोता घडवून आणला. भरोसा सेल ने ७८९ विभक्त झालेले कुटुंब पुन्हा नव्याने एकत्र जोडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल भरोसा सेल मध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकारी व अंमलदार यांना बक्षीस देण्याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर. यांनी सूचित केले.
तसेच भरोसा असेल येथून समझोता होऊन गेलेल्या उस्फुर्त जोड्यांनी बी. जी. शेखर यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन आपला भरोसा येथील चांगला अनुभव सांगितला.भरोसा सेल हे माणसे जोडण्याचे काम तर करतेच त्या मुळे पोलीस दलावर त्याचा परिणाम होऊन नागरिकांना पोलीस आपले खरे मित्र असल्याची जाणीव होते अशीही शाबासकीची थाप नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी भरोसा सेलला दिली आहे.