Homeक्राईमभिंगार परिसरात बेकायदेशीर धंदे,मंदिर ,शाळा, बाजार पेठेत खुलेआम सुरू नागरीकांना दिसणारे धंदे...

भिंगार परिसरात बेकायदेशीर धंदे,मंदिर ,शाळा, बाजार पेठेत खुलेआम सुरू नागरीकांना दिसणारे धंदे पोलिसांना का दिसत नाहीत

advertisement

अहमदनगर दि४ मार्च
नगर शहरात सध्या कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला
असून, वाढती गुन्हेगारी, अवैध व्यवसाय, खून, अत्याचार, भुमाफिया, दरोडे या घटना घडत आहेत. या विरोधात शिव राष्ट्र सेनेचे अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या संदर्भात त्यांनी पोलिस अधिक्षकांना निवेदन दिले आहे.

तर भिंगार परिसरात मंदिराच्या शेजारी आणि शाळेच्या आसपास आणि जेष्ठ नागरिक कट्ट्या जवळ मटका अड्डे बेकायदेशीर लॉटरी सेंटर खुलेआम सुरू असून विद्यार्थी आणि मंदिरात येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास असताना यावर पोलीस कारवाई करत नाहीत. तर भिंगार छावणी मंडळाच्या शॉपिंग सेंटर मध्ये खुलेआम बिंगो जुगार सुरू असून येणार्या जाणाऱ्या भिंगार वासीयांना हे दिसत आहे मात्र हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पोलीस स्टेशनला हे दिसत नाही हे विशेष या बिंगो जुगरा मुळे तरुण जुगाराच्या नादाला लागून कर्जबाजारी झाले आहेत मात्र पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचा या प्रकरणात दिसून येते कारण भर बाजारात पाण्याच्या टाकी खाली हा जुगार सुरू आहे.

संतोष नवसुपे यांनी निवेदनात म्हटले आहे की, सध्या शहरात राजकीय वरदहस्त असणाऱ्या गुंड प्रवृत्तीकडून दिवसाढवळ्या कायदा हातात घेऊन विविध प्रकारचे गंभीर गुन्हे या लोकांकडून घडत आहेत. पोलिस फक्त कारवाईविना बघ्याची भुमिका घेत आहेत. सध्या राजकीय कार्यकर्त्यांकडून बलात्कार, खून, बायोडिझेल, अवैध व्यवसाय, चोऱ्या, दरोडे आदि गुन्हे घडत आहेत. तसेच दिवसाढवळ्या राजरोसपणे मटका दारु तसेच इतर व्यवसाय तोफखाना, कोतवाली व भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरु आहेत.

“भिंगार पोलीस ठाण्याचे सहहयक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांची एक कर्तव्यदक्ष अधीकारी म्हणून ओळख आहे आणि भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांना वाचक बसेल आशा हद्दपार, मोकका,आशा कारवाया केल्याने हद्दीतील गुन्हेगार चिडीचूप झाले आहेत मात्र एक कर्मचाऱ्यामुळे अवैध धंदे जोरात सुरू असल्याची चर्चा भिंगार परिसरात आहेत कदाचित ठाण्याच्या प्रमुखांना अंधारात ठेऊन हे धंदे चालू असतील अशी शंका नागरिक व्यक्त करतायेत.”

याच ठिकाणाहून शाळकरी मुले व्यसनाधिन होत आहेत. महिलांवर अत्याचार हे व्यसनाधिनतेतून होत आहेत. महिलांवर अत्याचार हे व्यसनाधिन गुन्हेगार करीत आहे. दिवसाढवळ्या गुन्हे करुन राजरोसपणे फिरत आहेत. शहरात शांतता प्रस्थापित व्हावी व पोलिस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular