कल्याण दि. १७ एप्रिल
भोंगे आणि रॅलीलाच्या वादात आता आम आदमी पक्षाने उडी घेतली असून आम आदमी पक्ष आता राष्ट्रगीत वाजवणार आहेत.
सध्या राज्यात भोंगे आणि हनुमान चालीसा यावरून चांगलेच मोठे वादंग निर्माण झाले आहे राज्यातील सर्वच प्रश्न सध्या सुटल्यासारखं राजकीय नेते भोंगे आणि हनुमान चालीसा यावरच बोलताना ठिकाणी दिसत आहेत. यामुळे मागील काही दिवसांपासून रामनवमीच्या मिरवणुकीत तसेच हनुमान जयंतीच्या मिरवणुकी मध्ये चांगलीच वादावादी झाली आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती सध्या होऊन बसली आहे.
सर्वच भोंग्यांचा निषेध करत सर्व जाती धर्मांना एकत्र आणून राष्ट्रीय सलोखा निर्माण करणारे राष्ट्रगीत ‘आप’कडून चौकाचौकात वाजवले जाणार असल्याची माहिती आपचे प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांनी दिली आहे.
कल्याण डोंबिवलीत आपच्या कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन कले. महागाईने होरपळलेल्या आणि जगण्याचे प्रश्न निर्माण झालेल्या समाजात आपापसात फूट पाडून त्यांना जगण्याच्या प्रश्नापासून दूर करण्याची भाजपसह इतर राजकीय पक्षाच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो, असे धनंजय शिंदे यांनी म्हटले आहे.