अहमदनगर दि.१४ फेब्रुवारी
अहमदनगर शहरातील मार्केट यार्ड परिसरामध्ये एका जागेवरून अजय बोरा आणि औसारकर यांच्यामध्ये वादावादी सुरू आहे याबाबत दोन्ही बाजूंनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रारीदेखील केल्या आहेत. मात्र शनिवारी या प्रकरणात अहमदनगर शहर काँग्रेसच्या वतीने एक पत्रकार परिषद घेऊन यामध्ये झुंडशाही आणि दडपशाही होत असल्याचा आरोप व्यापारी अजय बोरा यांनी केला होता. तसेच या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस शहराध्यक्ष किरण काळे यांनीही आपण ्यापार्यांच्या पाठीमागे उभे असल्याचं वक्तव्य केलं होतं.
यानंतर सोमवारी समस्त माळी समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना एक निवेदन देण्यात आले असून गेल्या काही दिवसांपासून औसरकर कुटुंबीयांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होत आहे तसेच या जागे बाबत न्यायालयीन आदेश हा औसरकर कुटुंबीयांच्या बाजूनी असून सुद्धा या मध्ये त्यांच्यावरच खोटे आरोप करून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत औसरकर कुटुंबीय हे व्यवसायिक असून यापूर्वी त्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्यांच्यावर आरोप करणारे यांची पार्श्वभूमी तपासून पाहिले असता त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आल आहे.
या प्रकरणाला काही राजकीय व्यक्तींनी राजकीय स्वरूप आणण्याचा प्रयत्न केला असून यामुळे वातावरण चिघळण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे औसारकर कुटुंबियांची बदनामी थांबून या प्रकरणचा सखोल तपास करून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी समस्त माळी समाजातर्फे सोमवारी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांना निवेदन करण्यात आले आहे.
या वेळी माळी समाज बांधव ,फुले ब्रिगेड अहमदनगर शहर व ओबीसी व्हिजे एन टी जनमोर्चा यांच्या सह माळी बांधव भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या