Homeजिल्हायेथून पुढे जे निर्णय होतील ते जनतेच्या मान्यतेने होतील सरकारचे अण्णा हजारेंनी...

येथून पुढे जे निर्णय होतील ते जनतेच्या मान्यतेने होतील सरकारचे अण्णा हजारेंनी लेखी आश्वासन वाईन विक्री विरोधातील १४ फेब्रुवारी पासून सुरू होणार अण्णा हजारेंचे उपोषण स्थगित

advertisement

अहमदनगर – दि.१३ फेब्रुवारी
राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा जो निर्णय घेतला होता त्या विरोधात अण्णा हजारे १४ फेब्रुवारी पासून राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसणार होते मात्र दारू उत्पादन शुल्क विभागाच्या चीफ सेक्रेटरी वत्सला नायर यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली तसेच अण्णा हजारे आणि नायर यांच्या चर्चे मधून सरकारला तीन महिन्यांचा वेळ देण्यात आल्यानंतर अण्णा हजारे यांनी आज राळेगणसिद्धी येथे ग्रामसभा घेऊन ग्रामसभेची मते जाणून घेतली त्यानंतर ग्रामसभा आणि वत्सला नायर यांच्या पत्रानुसार अण्णा हजारे यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे.

अण्णा हजारे यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले की या पुढे जे निर्णय घेऊ ते जनतेच्या मान्यतेने असे लेखी दिले. ही आमची खरी लोकशाही आहे. अशा ग्रामसभा राज्यातील प्रत्येक गावात होणे आवश्यक आहे. त्यामुळे देश जागृक होईल. जनतेवर अऩ्याय अत्याचार करणारा निर्णय जनतेला न विचारता घेतल्यास आम्ही आंदोलन करू भले जेलमध्ये गेलो तरी चालेल. जनतेच्या भल्यासाठी समाजासाठी देशासाठी जेलमध्ये जाणे हे अलंकारासारखे आहे, असे अण्णा हजारे यांनी सांगितले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular