HomeUncategorizedराष्ट्रीय महामार्ग ६१ च्या दुरावस्थेबद्दल घेतलेल्या निबंध स्पर्धेस उदंड प्रतिसाद , नागरिकांच्या...

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या दुरावस्थेबद्दल घेतलेल्या निबंध स्पर्धेस उदंड प्रतिसाद , नागरिकांच्या भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पर्यंत पोहचवणार – मुकुंद गर्जे

advertisement

पाथर्डी दि.५ जानेवारी

कल्याण-निर्मल (विशाखापट्टणम) या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ बाबत केलेल्या केलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. १२ डिसेंबर राष्ट्रीय युवा दिनानिमित्त बक्षीस वितरण केले जाणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी दिली.या मार्गाबाबत अपेक्षा आणि वास्तव या विषयावर आयोजित खुल्या निबंध स्पर्धेला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.आपल्या भावना, व्यथा, दुःख व अपेक्षा ही या निमित्ताने निबंधातून जनतेने व्यक्त केल्या.

गेली अनेक वर्षांपासून रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग ६१ या विषयावर आयोजित खुल्या निबंध स्पर्धा घेत या प्रश्नाला वाचा फोडली. या अनोख्या उपक्रमास तालुक्यातील आणि तालुक्याबाहेरील अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धकांनी तालुक्यातील ज्वलंत प्रश्नांवर व रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग ६१ बद्दल अतिशय तीव्र भावना लिहून सर्व स्पर्धकांनी या अपुर्ण व दुरावस्था झालेला राष्ट्रीय महामार्ग लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी विनंती केली आहे. सर्व निबंध पंतप्रधान मंत्री कार्यालय आणि रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना पाठविण्यात येणार आहे.

 

या निबंध स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक विभागून अ- डॉ. अरविंद संतोष नागरे, ब- साहिल अय्युब पठाण, (पाथर्डी ),क आश्विनी वेदप्रकाश काळे, (अकोले), ड- गायत्री अजय साठे, (पाथर्डी),द्वितीय क्रमांक विभागून अ-झरीना अकबर शेख (पाथर्डी), ब-ऋषिकेश आदिनाथ शिरसाट (चिंचपूर रोड, पाथर्डी), क- गौरव बाळासाहेब गर्जे (दुलेचांदगाव, पाथर्डी) तृतीय क्रमांक विभागून अ-नेहा कृष्णा डोईजड (मेन रोड पाथर्डी ), ब आकांक्षा पोपट घुले (पाथर्डी), क- गोविंद सोमनाथ बंग (गांधी चौक, पाथर्डी)

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular