अहमदनगर दि . ९ फेब्रुवारी
महाराष्ट्र सरकार मार्फत किराणा दुकाने आणि मॉल मध्ये सरसकट वाईन उपलब्ध करण्याचा नुकताच निर्णय घेण्यात आला. या निर्णया विरोधात ‘युवान’ या सामाजिक संस्थेमार्फत मुंबई उच्च न्यायालयात नुकतीच जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
अल्कोहोलमुळे महिला अत्याचारात वाढ होते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होतो. हे सरकारच्या विविध अहवालात नमूद आहे. देशाची शक्ती असणाऱ्या युवा पिढीला व्यसन करण्यास प्रोत्साहन देणे निश्चितच धोक्याचे आहे. वाईन मधून मिळणाऱ्या महसुल आणि शेतीच्या काही उत्पन्नापेक्षा राज्यातील जनतेचे आरोग्य अधिक महत्वाचे आहे, असे विविध दाखल्यांसह याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
‘युवान’ मार्फत या निर्णय विरोधात जनजागृतीसाठी https://www.change.org/CM-ReverseWineDecision या द्वारे अराजकीय
ऑनलाईन सह्यांचे अभियानही राबविण्यात येत आहे. आपणही या अभियानात सहभागी होऊन ‘युवानला’ पाठींबा देण्याचे आवाहन युवान तर्फे करण्यात आले आहे