मुंबई दि.२२ जून
फेसबुक लाइव्ह दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण वर्षा बंगला सोडणार असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर अनेक शिवसैनिकांनी वर्षा बंगल्यावर धाव घेतली होती तर काही शिवसैनिक मातोश्री बाहेर जमले होते.
मुख्यमंत्र्यांच्या भाषनानंतर मुंबईभरातून शिवसैनिक वर्षा बंगल्याच्या दिशेने निघाले होते. एवरी राडा घालणाऱ्या शिवसैनिकांच्या डोळ्यात आज अश्रू दिसत होते. आपल्या नेत्याला झालेल्या दु:खामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिक दुखावल्याचं सांगितलं जात होतं. शेवटी आज 9 वाजून 45 मिनिटांनी उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्य ठाकरे यांना सोबत घेऊन मातोश्रीच्या दिशेने निघाले. वर्षाच्या दाराच्या बाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. मुख्यमंत्र्यांनी उंबरठा ओलांडताच शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यांच्या गाडीला मुख्यमंत्र्यांनी गराडा घातला. आपल्या नेत्यासाठी हे शिवसैनिक मुंबईतील कानाकोपऱ्यातून येत होते. यावेळी रश्मी ठाकरे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
मुंबईतील वर्षा ते मातोश्री या दरम्यानच्या रोडवर प्रचंड शिवसैनिकांची गर्दी असून यामध्ये महिलांचा मोठा सहभाग दिसून येत आहे.ठीक ठिकाणी फुलांचा वर्षाव करुन शिवसैनिक उद्धव ठाकरे यांचे स्वागत करत आहेत आणि आम्ही तुमच्या बरोबर असल्याची ग्वाही देताना चित्र दिसत आहे अनेक महिलांच्या डोळ्यात अश्रू दिसून आले. काही ठिकाणी ताफा थांबून उद्धव ठाकरे यांनी महिलांचे अभिवादन नही केले.