बारामती दि.१८ एप्रिल
मोबाईल मध्ये ज्या प्रमाणे रिचार्ज करता येतो त्या प्रमाणे वीज बिलासाठी देखील तशीच यंत्रणा विकसित करण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे बोलताना सांगितलंय.
वीजबिलासाठी जर प्रिपेड कार्ड यंत्रणा विकसित करण्यात आली तर त्याचे अनेक फायदे आहेत. मुख्य फायदा असा की, तु्म्ही जेवढी वीज वापराल तेवढेच बिल किंवा तेवढ्याच पैशांचे रिचार्ज तु्म्हाला करावे लागेल. वीजबिल भरणे अधिक सोपे होईल. तसेच जे वीजेचे नियमित बिल भरतील त्यांनाच या सेवेचा लाभ घेता येईल. त्यामुळे वीजबिल थकणार नाही. सोबतच वीज चोरीला देखील आळा बसेल. याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आम्ही वीजबिला देखील प्रिपेड कार्डा पर्याय देण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्यात वीज टंचाईचे मोठे संकट असून ग्राहकांकडे मोठी थकबाकी आहे ती थकबाकी भरून वीज वितरण मंडळाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी थकबाकीदारांना केल आहे.