Homeक्राईमशेतकऱ्यांना लाखो रुपयांना फसवणाऱ्या भामट्याला सायबर पोलिसांनी ठोकल्या बेड्या,वेबसाईट वरील लिंक वरून...

शेतकऱ्यांना लाखो रुपयांना फसवणाऱ्या भामट्याला सायबर पोलिसांनी ठोकल्या बेड्या,वेबसाईट वरील लिंक वरून करत होता शेतकऱ्यांची फसवणूक

advertisement

अहमदनगर दि १ फेब्रुवारी
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील राक्षी या गावातील शेतकऱ्याला सरकारी योजने अंतर्गत सौरपंप देतो अशी बतावणी करुन फसवणूक करण्यात आली होती. या बाबत शेतकऱ्याने सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता फेसबुक आणि व्हाट्सआपच्या माध्यमातून हा फसवणुकीचा प्रकार होत असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात पुढे आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचनेप्रमाणे सायबर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी या प्रकरणाचा तपास करून
औरंगाबाद जिल्ह्यातील अपेगाव येथून किशोर विठ्ठल काळे याला ताब्यात घेतले असून आरोपीने सोशल मीडियाद्वारे लोकांना मेसेज टाकून फसवणूक केल्याचं उघड झाला आहे.

हा गुंतागुंतीचा असल्याने सायबर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रतिक कोळी ,पोहेकॉ योगेश गोसावी,पोहेकॉ उमेश खेडकर पाना दिंगबर कारखेले,मलिक्कार्जुन बनकर,राहुल हुसळे, पोकॉ. अरूण सांगळे, भगवान कांडार ,पोहेकॉ वासुदेव शेलार या सायबर पोलीस स्टेशन यांचे पथकाने सदर गुन्हयामध्ये तांत्रीक विश्लेषण करून आरोपीचा ठाव ठिकाणा शोधून काढत त्याला बेड्या ठोकल्या आहे.

jalsanjivni.in या वेबसाईडव्दारे सरकारी योजने अंतर्गत सौरपंप देतो असे सांगुन ज्या लोकांची फसवणुक झाली असेल तर त्या शेतकऱ्यांनी सायबर पोलीस स्टेशन अहमदनगर येथे संपर्क साधावा.असे आवाहन सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी केले आहे.

तसेच नागरीकांनी आपले सोशल मिडीया व्हाटसअॅप , इंस्टाग्राम , फेसबुक अकाऊंट हे प्रायव्हसी
लॉक करावे. अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारू नये. मेसेज व्दारे आलेली कोणतीही लिंक ओपन करू नये. सोशल मिडीयावर येणा-या फसव्या जाहिरीताला बळी पडू नये असे आवाहनही सायबर पोलिसांनी केले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular