अहमदनगर दि.१५ फेब्रुवारी
गेल्या दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे काही अतिरेक्यांनी रेकी करून गेले असल्याच्या बातम्या झळकत आहेत मात्र या बातम्यांमध्ये काही तथ्य नसून पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.सर्व संबंधीत तपास यंत्रणाशी संपर्क करुन प्रसिध्दीस दिलेल्या बातमीची खात्री केली असता अशा प्रकारची घटना अहमदनगर जिल्ह्यात कोठेही घडली नसल्याचं अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सांगितल आहे.
प्रथम काही बातम्यांमध्ये एका खाजगी वृत्तवाहिनीच्या संपादकांच्या घराची रेकी केल्याची बातमी आली होती मात्र मंगळवारी सकाळपासून साईबाबा मंदिराची रेकी केल्याच्या बातम्या काही माध्यमांनी प्रसारित गेल्यानंतर पोलिसांनी तातडीने सर्व तपासी यंत्रणेकडून माहिती घेतली असता या प्रकरणात काही तथ्य नसल्याचं आढळून आले आहे.
त्यामुळे नागरिकांनी या बातमीवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं आहे साई बाबांची शिर्डी सुरक्षित होती आणि सुरक्षित आहे असंही पोलिस दलातर्फे सांगण्यात आलंय.