Homeशहरसाहेब अशा पध्दतीने खड्डे बुजवून उपकार करण्यापेक्षा खड्डे बुजवून मनपाचे पैसे का...

साहेब अशा पध्दतीने खड्डे बुजवून उपकार करण्यापेक्षा खड्डे बुजवून मनपाचे पैसे का वाया घालताय फेज 2 चे खड्डे बुजवण्याचा नगरी पॅटर्न,ऍड. शाम आसवांनी लिहले मनपाला उपहासात्मक पत्र

advertisement

अहमदनगर दि २१ मार्च

अहमदनगर शहरासह उपनगरांमध्ये फेस टू चे काम सुरू आहे त्यासाठी शहरात विविध ठिकाणी खड्डे खोदण्यात येत आहे मात्र फेजटू ची पाईपलाईन टाकल्यानंतर हे खड्डे व्यवस्थित बुजवण्याचे काम संबंधित ठेकेदाराकडे असल्याने हे काम अत्यंत दर्जाहीन चालू असून चक्क मातीत सिमेंट काँक्रेट टाकून खड्डे बुजवले जात आहेत तर शहरातील काही रस्त्यांवर नावाला डांबर टाकून खडी पसरवली जात आहे या बाबतचे फोटो महानगर पालिकेचे आयुक्त शंकर गोरे याना पाठवून सामाजिक कार्यकर्ते ऍड.शाम असावा यांनी लक्ष वेधले आहे.

फेज टू च्या पाईप लाईन साठी खड्डे केल्यानंतर पाईप लाईन टाकण्याचे काम झाल्यानंतर झालेले खड्डे बुजवणे ठेकेद्राचे काम असून ते खड्डे अत्यंत चुकीच्या पद्धतीने बुजवले जात असल्याने पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

मातीवर सिमेंट काँक्रेट टाकून हे खड्डे बुजवले जात आहेत त्यामुळे खड्डे खरंच बुजणार का हा प्रश्न निर्माण होतोय त्यामुळे महापालिका बांधकाम विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा काही दिवसात पुन्हा महानगरपालिकेला खड्डे बुजवले लागतील तर शहरातील काही रस्त्यांवर खड्डे बुजवण्या साठी खडी आणि डांबर टाकून खड्डे बुजवण्याचे काम सुरू असून या ठिकाणी डांबर फक्त नावालाच टाकले जात असून खडी पसवरण्याचे काम सुरू आहे त्यामुळे या वरून गाडी घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अत्यंत दर्जाहीन काम होत असताना महानगरपालिका प्रशासन गप्प का असा प्रश्न उभा राहतो.

शाम असावा यांनी अहमदनगर मनपाचे महापौर,आयुक्त यांना एक उपहासात्मक पत्र मेल द्वारे पाठवले असून त्यात लिहलेला मजकूर असा की

मेहरबान या करीता संबोधले कारण अहमदनगर पालीका हद्दीतील काही निवडक खड्डे तरी बुजविण्याचे काम महापालिकेने हाती घेत नगरवासीयांवर मेहरबानी केली आहे.आपणास या मेल सोबत शहरातील मुख्य बाजारपेठेतील मुख्य असलेल्या मुख्य बाजारपेठ आणि माणिकचौक भागातील बुजविलेल्या खड्ड्यांचे फोटो पाठवत आहे. जरा झुम करुन पहावेतवया खड्ड्यांमध्ये चार पाच दिवसांपुर्वी खडी टाकुण ते बुजविण्यात आले आहेत. परंत त्यावर वेळीच डांबर न पडल्याने सदर खडी निघुन सर्वत्र पसरली आहे. कदाचीत खडी टाकण्यांचीच तरतुद असेल, डांबर उपलब्ध नसेल, डांबर टाकण्याचे विसरुन गेले असतील, उन्हाच्या तडाख्या डांबर बिले काढण्यापुरते दिसावे म्हणून ईतके पातळ टाकले असेल की बाष्प भवन होवुन उडाले असेल. कारण काहीही असो परंतु खड्ड्यात भरलेली खडी बाहेर आली आहे हे मात्र नक्की. या मुळे खड्डे तर भरले जात नसुन उलट पसरलेल्या खडी मुळे घसरुन अपघात होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.

मुळात खड्ड्यांमुळे लोकांची हाडके मनके आपोआपच खिळखिळी होत आहेत त्यामुळे गावगुंडांना लोकांना तुडवायघी व बडवायची गरज नाही परंतु असल्या प्रकारे खड्डे बुजवून महानगरपालिकेचा पैसा व पर्यायाने नगरवासीयांना अधिक खड्ड्यात घालण्याची आवश्कता नाही.

विविध कामातील भ्रष्ट लोकप्रतिनिधी अधिकारींची वाटमारीचा पैसा स्थानिक बाजाराच्या अप्रत्यक्ष येतो व यातुन बाजारात भरभराट होण्यास मोठे योगदान देत असले तरी तेथील रस्त्यावरील खड्डे व्यवस्थीत बुजवावेत

तरी आपणास विनंती की खड्डे बुजविण्याचे काम चालु असतांना खड्डे बुजवीतांना पर्याप्त प्रमाणात डांबर वापरले जाईल या बाबत खात्री करावी. नाहीतर झाडे लावण्याबाबत दरवर्षी खड्डा तोच व झाड नवे तसेच खड्डे बुजविण्याबाबतही खडा तोच परंतु बुजविल्याचे बील नवे ही परंपरा कायम राहील

आता या पत्रानंतर महानगरपालिका खरच जागे होईल का का खोटं झोपेचे सोंग घेऊन नगरकरांना कायमस्वरूपी खड्ड्यात ठेवणार आहे हे पाहावे लागणार आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular