Homeजिल्हासुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्री निर्णयाच्या विरोधात प्राणांतिक उपोषण करण्याबाबत...

सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्री निर्णयाच्या विरोधात प्राणांतिक उपोषण करण्याबाबत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठवलेल्या पत्राल राज्य सरकार कडून ठेंगा

advertisement

राळेगणसिद्धी दि ५ फेब्रुवारी
”राज्य सरकारच्या सुपरमार्केट वाईन विक्रीच्या निर्णयामुळे राज्यातील मुलांच्यावर जी आमची खरी संपत्ती आहे. या बालकामध्येच उद्याचे महापुरूष निर्माण होणार आहेत. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. ही युवाशक्तीच राज्य आणि राष्ट्र घडवू शकेल यावर आमचा विश्वास आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक परिवाराचे उज्वल भविष्य ज्या मुलींना, युवतींना घडवायचे, जिच्या हाती पाळण्याची दोरी। ती जगाला उद्धारी। या युवतींवर या वाईनच्या वातावरणाचा काय दुष्परिणाम होईल, एकूण समाजावर काय परिणाम होतील याचा सरकारने विचार केलेला दिसत नाही. फक्त मिळणाऱ्या महसुलाचा मर्यादीत विचार केलेला दिसतो. ज्या सत्तेमध्ये समाज, राज्य, राष्ट्र हिताचा विचार नसेल अशी सत्ता काय कामाची? ज्यांनी राज्य चालवायचे आहे त्यांनी जनतेचा सल्ला न घेता आपल्या मनाला जे योग्य वाटते असे निर्णय घेणे म्हणजे लोकशाही नव्हे. लोकशाही ही लोकांची आहे. ती लोकांची, लोकांनी, लोकसहभागातून चालविली पाहिजे अन्यथा इंग्रजांच्या आणि आमच्या हुकूमशाहीत फरक राहणार नाही.”
असे खरमरीत पत्र जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहले आहे.

नुकतेच महाराष्ट्र सरकारने राज्यातील सुपरमार्केट आणि किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीला ठेवण्याचा परवाना देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय महाराष्ट्र राज्यासाठी अत्यंत दुर्दैवी निर्णय असल्याने येणाऱ्या पिढ्यांसाठी घातक असल्याने मी या सरकारचा निषेध करण्यासाठी प्राणांतिक उपोषण करण्याचा निर्णय अण्णा हजारे यांनी घेतला आहे. त्यासंबंधाने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना या आधी पत्र पाठवूनही सरकार कडून अद्याप कोणत्याही प्रकारचे उत्तर आलेले नाही.

त्यामुळे अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला पुन्हा स्मरण पत्र पाठवले आहे.राज्यातील बऱ्याच संस्था आणि संघटनांनी शासनाने घेतलेल्या वाईनच्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक संघटना अण्णा हजारे यांच्या संपर्कात आहेत.

सुपरमार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगीच्या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी आंदोलन केले जाईल असा इशारा अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या स्मरण पत्रात दिला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular