अमरावती दि.१ जानेवारी
जीवनात मृत्यू कोणालाच चुकला नाही मृत्यू नंतर काय होते हे कोणालाच माहीत नसते ते पाहायला आपण नसतोच मात्र आपल्या मृत्यू आधीच मृत्यू नंतरच्या सर्व विधी केल्या तर असा मनात विचार आला आणि तो आमलातही आणला सेवा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुखदेव डबरासे यांनी. सुखदेव डबरासे हे अमरावती येथे राहत असून त्यांचे काही मित्र सेवानिवृत्त झाल्या नंतर काही वर्षातच स्वर्गवासी झाले. त्यामुळे आपल्या मारणाआधीच आपले सर्व मित्र मंडळी नातेवाईक बोलवायचे आणि त्यांच्या सोबत जेवढा वेळ घालवता येईल तेव्हढा वेळ घालवायचा असा विचार करत स्वतःच्या तेरवी चा निर्णय घेतला. त्यांचा मुलगा मुंबईत बॉक्सिंग कोच आहे. एक मुलगी शिक्षिका, तर धाकटी पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन खात्यात रुजू होणार आहे. या सर्व कुटुंबीयांनी सुखदेव याना विरोध केला. मात्र त्यांची समजूत घालून सुखदेव डाबरासे यांनी हा कार्यक्रम पार पडला. त्यांनी या तेरवीची पत्रिका छापली होती. ज्यामध्ये लिहलं की, मला सेवानिवृत्त होऊन 5 वर्ष सहा महिने होत आहे. त्यामुळे मी सेवानिवृत्त होऊन पेन्शनचा आनंद घेतल्यामुळे पुढील आयुष्य जगण्याची इच्छा नाही. तसेच माझा मुलगा बाहेर गावी नोकरीला आहे. मला केव्हा मरण येईल याची शाश्वती नसल्याने हा कार्यक्रम स्वेच्छेने करत असल्याचं सांगत त्यांनी पत्रिका वाटली होती. जगात असेही लोक आहेत जे आपला मृत्यू पूर्वीचा आनंदही आपल्या कुटुंबियांबरोबर मित्रा बरोबर साजरा करत आहेत सध्या अमरावती शहरात या तेरवीची चांगलीच चर्चा रंगली आहे.