अहमदनगर दि २५ फेब्रुवारी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने शनिवारी महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित, गट ब, संयुक्त (पूर्व) परीक्षा जिल्ह्यातील ६० उपकेंद्रावर सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत शांततेत व सुरळीत पार पडली.
मात्र जिल्हाभरातून आणि जिल्ह्याबाहेरून अनेक विद्यार्थी सकाळीच शहरात दाखल झाल्यामुळे अनेक चारचाकी वाहनांमुळे संपूर्ण शहर चक्का जाम झाले होते तसेच आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन होते त्यामुळे या ठिकाणची वाहतूक एकेरी करण्यात आली होती या सर्व प्रकाराचा ताण नगर शहरातील पडल्यामुळे शहरातील सर्व रस्ते जाम झाले होते.
लालटाकी पासून नेप्ती चौकापर्यंत तसेच महेश थिएटर पासून कोठी पर्यंत तसेच शहरातील विविध छोटे मोठे रस्ते जाम झाले होते त्यामुळे नगरकरांना अनेक वेळ वाहतुकीमध्ये अडकून राहावे लागले होते.
या वाहतूक कोंडी मध्ये सुद्धा नगर शहरातील रिक्षाचालकांचा मुजोरपणा दिसून आला कुठेही उभा राहणे आणि वाहतूक नियमांचे पालन न कारण्याची शपथ जणू काही रिक्षा चालकांनी खाल्ली आहे त्याचा प्रकारे ही रिक्षा चालक शहरातून वाहन चालवत असतात आणि अपघातास कारण ठरतात मात्र तरी शहर वाहतूक पोलिस त्यांच्यावर कारवाई का करत नाही हा एक मोठा प्रश्न समोर येत आहे.