अहमदनगर दि २४ फेब्रुवारी
दि.२६-०२-२०२२ रोजी वीज पारेशण कंपनीकडून त्यांचे महत्वाच्या दुरूस्ती कामांसाठी घेण्यात येणा-या शट डाउनमुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागास एक दिवस विलंबाने पाणी पुरवठा होणार आहे.
२६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य विद्यूत पारेषण
कंपनीकडून ३३ के.व्ही. मुळा डॅम वाहिनीचे फिडर शिफ्टींगआणि दुरूस्ती कामासाठी सकाळी १०.०० ते
०५.०० वाजेपर्यत शट डाउन घेण्यात येणार आहे. तसेच सदर शट डाउन वेळेत अहमदनगरमहानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘अमृत’ पाणीपुरवठा योजनेची महत्वाची कामे कार्यरत शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्वाची दुरूस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
अहमदनगर महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्वाची दुरूस्तीची कामे शनिवार दि.२६-०२-२०२२ रोजी सकाळी १०.०० ते सायं.०५.०० वाजेपर्यंत करण्यात येणार आहेत. दरम्यानच्या काळात मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही.
त्यामुळे शनिवार दि.२६-०२-२०२२ रोजी बोल्हेगाव,नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर,
मुकुंदनगर तसेच सारसनगर, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर इ. भागास
[सकाळी ११.०० नंतरच्या पाणी वाटपाच्या भागास] पाणीपुरवठा होउ शकणार नाही. सदरचा
पाणीपुरवठा हा रविवार दि.२७-०२-२०२२ रोजी करणेत येईल.
तसेच रविवार दि.२७-०२-२०२२ रोजी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर व सावेडी इत्यादी भागात महानगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा करण्यात येणार नाही. या भागातील पाणीपुरवठा हा रविवार ऐवजी सोमवार दि.२८-०२-२०२२ रोजी करण्यात येईल.
सोमवार दि.२८-०२-२०२२ रोजी पाणीपुरवठा होवू घातलेल्या मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको,
प्रेमदान हाडको, म्युनिसीपल हाडको इत्यादी भागात पाणीपुरवठा होणार नसून तो मंगळवार दिनांक
०१-०३-२०२२ रोजी करण्यात येईल.
शहरातील पाणीपुरवठा एक दिवस बंद करून उपनगरात ज्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आलेले आहे अशा भागात पाणीपुरवठा करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. तरी नागरीकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे,असे मनपाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे.