Homeराजकारणप्रभाग क्रमांक ९ च्या पोटनिवडणुकीत पराभव कोणाचा ?

प्रभाग क्रमांक ९ च्या पोटनिवडणुकीत पराभव कोणाचा ?

advertisement

अहमदनगर दि.२३ डिसेंबर
अहमदनगर महानगरपालिकेची प्रभाग क्रमांक ९ क ची पोटनिवडणूक नुकतीच पार पडली. या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून अनेक धडे राजकारण्यांना मिळाले आहेत. या पोटनिवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच राज्य आहे त्या तीन पक्षातील दोन पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तर यातील काँग्रेस पक्षाने या निवडणुकीपासून थोडं अलिप्त धोरण राबवलं होतं. या निवडणुकीच्या सुरुवातीलाच महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचं समोर आलं होतं.महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार पत्रकार वरून थेट काँग्रेस नेत्यांचे फोटो गायब करण्यात आले होते. इथूनच महाविकासआघाडी मध्ये बिघाडी झाल्याचं समोर आलं होतं.

निवडणूक जसजशी पुढे सरकत होती तसं तश्या अनेक घटना आणि घडामोडी या निवडणुकीच्या दरम्यान घडल्या. पुढील निवडणुकीचे गणित डोक्यात ठेवून अनेकांनी निवडणुकीत काम केलं. २०१८ मध्ये महानगरपालिकेच्या निवडणूक झाल्यानंतर शिवसेना सर्वात मोठा पक्ष असताना आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही राष्ट्रवादीने शिवसेनेला सोडून कमी नगरसेवक असलेल्या भाजपला बरोबर घेत भाजपचा महापौर बनवला होता. त्याच राष्ट्रवादीने या निवडणुकीमध्ये सोयीची भूमिका स्वीकारत महाविकास आघाडीचा उमेदवार उभा केला. विशेष म्हणजे याबाबत शिवसेनेच्या एकाही नेत्याने शब्दही काढला नाही कारण जेव्हा २०१८ ला शिवसेना महापौर पदावर दावा करत असताना राष्ट्रवादीने भाजप बरोबर जात भाजपचा महापौर केला. मात्र 2020 च्या महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी कडे तगडा उमेदवार नसल्याने महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राबवला होता. 

 

राष्ट्रवादी काँग्रेस ने या पोटनिवडणुकीत सोयीस्कर भूमिका घेत दोन वर्षांसाठी शिवसेनेला महाविकास आघाडीचा गुलाबजाम खाऊ घातला आणि आघाडीचा उमेदवार उभा केला. आघाडीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि नगरसेवक यांची ताकद मोठी असताना शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असताना  आणि प्रदीप भैय्या परदेशी यांच्या काही निवडक कार्यकर्त्यांनी आणि भाजपच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांनी  बलाढ्य आघाडीला धूळ चारली ही एक ऐतिहासिक घटना नगर शहरात प्रभाग क्रमांक 9 मध्ये घडली आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच काँग्रेसने शिवसेनेच्या नुतन शहाराध्यक्षांवर टीका करत त्यांच्यामुळेच उमेदवार पडल्याचं खापर फोडलं. त्यामुळे पुढच्या काळात महाविकास आघाडीचे चित्र कसे राहील याबाबत पहिली झलक मिळून आली.शिवसेनेतील काही नेतेही या महाविकास आघाडी वर नाराज होते जेव्हा महापौरपद शिवसेनेच्या तोंडातून हिसकावून घेण्यात आले त्याच राष्ट्रवादीबरोबर जाण्यास त्यांना रस नव्हता.मात्र पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे विकास आघाडी मध्ये जाणं भाग पडलं आणि शिवसेनेला पुन्हा एकदा तोंडावर पडावे लागले. या निवडणुकीत स्वर्गीय अनिल राठोड यांची उणीव मात्र अनेक जुन्या शिवसैनिकांना जाणवली. निवडणुकीनंतर सोशल मीडियावर अनिल भैया तुम्ही परत या तुमची उणीव जाणवते या पोस्ट व्हायरल झाल्या त्या यावरूनच शिवसैनिकांच्या भावना समोर आल्या होत्या.

मात्र या थंडीच्या दिवसात राजकीय वातावरण चांगलेच गरम करून प्रदीप भैय्या परदेशी यांनी आपला विजय मिळवत महाविकास आघाडीला चांगलाच टोला दिला आहे.या निवडणुकीत राष्ट्रवादीचा काहीच तोटा झाला नाही करण राष्ट्रवादीला भाजप काय आणि शिवसेना काय कोणी निवडून आले तरी तो कामासाठी राष्ट्रवादी कडेच जाणार भाजपची एक जागा वाढली तर शिवसेनेला हक्काच्या प्रभागात पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे या निवडणुकीत पराभव महाविकास आघाडीचा नव्हे तर फक्त शिवसेनेचा झाला आहे.त्यामुळे पुढील काळात शिवसेनेला या पराभवचे आत्मपरीक्षण करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय रणनिती करायची याबाबत आत्तापासूनच विचार करावा लागेल.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular