Homeजिल्हास्वच्छ शहर मानांकन मिळून आठवडा होत नाही तोच नगर मध्ये पुन्हा कचऱ्याचे...

स्वच्छ शहर मानांकन मिळून आठवडा होत नाही तोच नगर मध्ये पुन्हा कचऱ्याचे साम्राज्य, अनेक ठिकाणी कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या येतच नाहीत, तर नागरिकांनी टाकलेला कचरा पेटवून दिल्याने प्रदूषणात वाढ, ठेकेदारावर कारवाई करण्याची माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांचा इशारा

advertisement

अहमदनगर प्रतिनिधी –
अहमदनगर शहराला केंद्र सरकार च्या वतीने दिला जाणारा स्वच्छ शहर पुरस्काराचे नामांकन भेटून आठवडा उलटला नाही योच नगर शहरात ठिकाणी घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे, सावेडी भागात गेल्या काही दिवसांपासून घंटागाड्या येतच नसल्याने नागरिक आपल्या घरातील कचरा काही ठराविक ठिकाणी टाकण्याचे चित्र ठिकाणी पाहायला मिळत असून.सावेडी परिसरातील गंगा उद्यान शेजारील रोडवर गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. हा कचरा उचलला जात नसून महानगरपालिकेने नेमून दिलेला कचरा संकलन करणारी संस्था या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत असून. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास गंगा उद्यान शेजातील कचरा अज्ञात लोकांनी पेटवून दिल्याने प्रचंड जाळ बानी धुराचे लोट उठत होते विशेष म्हणजे ज्या ठिकाणी कचरा पेटला गेला त्या शेजारीच विद्युत वितरण महामंडळ ची मोठी डीपी आहे. तसेच लाईटचे पोल होते याठिकाणी मोठी घटना घडण्याची शक्यता होती

मात्र हा प्रकार समजताच माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह धाव घेत आग विजवली. गेल्या काही दिवसांपासून या कचरा प्रश्नी मागील आठवड्यातच कचरा उचलणे बाबत ठेकेदाराबरोबर बैठक घेऊन चर्चा करून कचरा गाड्या नियमित पाठवाव्यात असे सांगून सुद्धा ठेकेदार संस्था याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी केली आहे अन्यथा ठेकेदार संस्थे विरुद्ध महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे सोमवारी तक्रार करणार असल्याचेही बोरकर यांनी सांगितले आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular