Homeजिल्हानगर अर्बन बँक चे कर्ज थकबाकीदारांना एकरकमी कर्ज परतफेडी ची एक संधी...

नगर अर्बन बँक चे कर्ज थकबाकीदारांना एकरकमी कर्ज परतफेडी ची एक संधी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाने अर्बन चे ६० कोटीहून अधिक थकीत कर्ज वसुलीस होणार मदत

advertisement

अहमदनगर दि.३ सप्टेंबर –

नगर अर्बन बँकेचे थकीत कर्ज वसुली करीता एक रकमी कर्ज परतफेड योजना (वन टाईम सेटलमेंट स्किम)(A lump sum loan repayment )राबविण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने अर्बन बँकेच्या संचालक मंडळाने मंजूर केलेल्या एक रकमी परतफेड योजनेस मंजुरी दिली आहे.


नगर अर्बन बँकेच्या ( Urban Bank)अनुत्पादक कर्जाच्या प्रभावी वसुलीसाठी अर्बन बँकेच्या नूतन संचालक मंडळाने एकरकमी कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ करण्याची शिफारस दिनांक ०६ मे २०२२ रोजी ठराव करून भारतीय रिझर्व्ह बँक(Reserve Bank of India) कडे केली होती. यापूर्वी राबविण्यात आलेल्या या योजनेची कट ऑफ डेट ३१ मार्च २०१९ पर्यंत ची ठरविण्यात आलेली होती परंतु त्यास मंजुरी उशिरा मिळाल्याने अपेक्षित अशी वसुली करता आलेली नव्हती. कर्ज थकविण्याची वाढती प्रवृत्ती लक्षात घेऊन तसेच बँक सध्या अत्यंत अडचणीच्या काळातून मार्गक्रमण करत असल्याने व अनेक कर्जदार यांना कोविड काळात त्यांच्या व्यावसायिक अडचणींचा गांभीर्य लक्षात घेत संचालक मंडळाने सदर योजनेस मुदतवाढीची शिफारस आर बी आय कडे केली होती. आर बी आय ने शिफारस मान्य करीत योजनेची कट ऑफ डेट ३१ मार्च २०२० केल्याबद्दलचा आदेश काढला असून पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे ०१ एप्रिल २०१९ पासून हा आदेश लागू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कट ऑफ डेट ३१ मार्च २०२० असून जी कर्ज खाती ३१ मार्च २०२० रोजी किंवा त्या आधी एन पी ए झालेली आहे त्या कर्ज खात्यांना बँकेच्या मंजूर एक रकमी परतफेड योजनेचे नियम व अटींना अनुसरून ह्या योजने चा लाभ मिळणार आहे अशी माहिती बँकेचे प्रभारी कार्यकारी अधिकारी  एम. पी. साळवे यांनी दिली. रिझर्व्ह बँकेच्या सदर निर्णयामुळे अर्बन चे ६० कोटीहून अधिक चे थकीत कर्ज(loan defaulters)वसुलीस मदत होणार असल्याबाबत ची माहिती संचालक मंडळाने दिली आहे.

‘वन टाइम सेटलमेंट’ या योजनेस आर बी आय ने कट ऑफ डेट ३१ मार्च २०२० करण्याची परवानगी देऊन बँकसाठी खूप चांगला निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे थकित कर्ज वसूल तर होईलच शिवाय बँकेचे एनपीए कमी होण्यास मोठी मदत होईल तसेच बँकेच्या १००% प्रोव्हिजन झालेले खात्यांची तरतूद माघारी होऊन बँकेच्या नेटवर्थ वाढीस ही मदत होणार आहे. त्यामुळे सदर निर्णय लवकरात लवकर व्हावा या करीता आम्ही थेट भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मुंबई येथील कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना सदर निर्णय लवकरात लवकर घेण्या बाबत साकडे घालून आलो व काल बँकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय झाल्याने आपण त्याचा स्वागतच करतो. – ईश्वर अशोक बोरा, गिरीश केदार लाहोटी संचालक, नगर अर्बन को ऑपरेटिव्ह मल्टीस्टेट शेड्यूलड बँक लि.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular