अहमदनगर दि.८ जुलै
तरुण पिढी मध्ये सध्या रस्त्यावर ,चौकात, वाढदिवस साजरा करण्याची जणू फॅशन झाली आहे वाढदिवस साजरा करताना होणारा धुडगूस फटाकडे फोडणे वेगवेगळे स्प्रे एकमेकांच्या अंगावर उडवणे चारचाकी गाड्या उभा करून कर्कश आवाजावर नाचणे असे प्रकार शहारत ठिकठिकाणी दिसून येत आहे मात्र हे करताना त्यांना अडवणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे .
वाढदिवस हा प्रत्येक मनुष्याचा जीवनातील आनंदाचा क्षण असतो आणि तो वेगवेगळ्या पद्धतीने साजराही होत असतो आणि करायलाही पाहिजे मात्र आजकालची तरुण पिढी हा आनंदाचा क्षण वेगळाच पद्धतीने साजरा करताना दिसतात भर चौकामध्ये दुचाकी वर अथवा चार चाकी गाडी उभा करून त्यावर केक ठेवून तो कापणे केक तोंडाला लावण्याच्या नादात होणारी धरपकड, फटाकडे उडवणे ,नाच गाणी करणे यामुळे इतर जाणाऱ्या येणाऱ्यांना लोकांना त्रास होईल याचीही भान या तरुणांना नसते पण यामधून अनेक वेळा वादही होतात. मात्र ही प्रथा दिवसेंदिवस वाढत चालली आहे रात्री बारा वाजता रस्त्यावर उभे राहून केक कापून फटाकडे उडवणे ही आता फॅशन सुरू झाली आहे. यामुळे अनेक वेळा वादाचे प्रसंग उधभवतात. मात्र याला आळा कोण घालणारा असाच प्रश्न आता समोर येऊ लागला आहे.