अहमदनगर दि.१७ जून
शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलाच्या सुशोभीकरणात भर पडावी व छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन पट समाज व युवा पिढीसमोर यावा यासाठी खा. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून उड्डाणपुलाच्या पिलरवर छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणापासून ते राज्यभिषेकपर्यंतचा जीवन पट चित्राच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ नुकताच खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत झाला होता आता हा इतिहास हळू रंग घेत असून पिलर क्रमांक ४० वर छत्रपती शिवाजी महाराजांची औरंगजेबाच्या कैदेतून आग्र्याहून सुटका हे चित्र आता आकार येऊ लागले आहे.
उड्डाणपुलाच्या सुशोभीकरण करणासाठी एक कोटी रुपयांचा निधी खासदार आणि आमदार निधीतून वापरला जाणारा असून उड्डाणपुल पूर्ण झाल्या नंतर त्याखाली लाईट आणि काही ठिकाणी वृक्षांच्या आकारातील कमानी या उड्डाणपुलाची अजून शोभा वाढवणार आहेत.