अहमदनगर दि ५ मे (सुशील थोरात)
महराष्ट्रात भोंग्यावरून वातावरण तापलेले असताना मात्र नगर शहारत पोलीस आणि मुस्लिन समाजाच्या सामंजस्याने भोंगे बंद करण्याचा निर्णय झाला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंगे बंद करण्याचा आधी तीन मे आणि नंतर चार मे असा शेवटचा ईशारा दिला होता त्या आधी पासूनच नगरचे पोलीस दल कमला लागले होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्वच पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना देऊन सर्वांनी आपापल्या हद्दीतील मुस्लिम समाजाच्या प्रार्थना स्थळा मधील मौलवी, इमाम आणि विश्वस्त जेष्ठ नागरिक तरुण यांच्याशी चर्चा करू बैठक घेण्याच्या सूचना दिल्या होत्य. विशेष म्हणजे शहरातील सर्वच प्रार्थनास्थळा मधील इमाम आणि विश्वस्तनांनी पोलिसांना सहकार्य केले .
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे, आणि कोतवाली पोलीस ठाण्याचे गुप्तवार्ता विभागाचे सहहयक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गर्गे, पोलीस नाईक योगेश खामकर,पोलीस कॉन्स्टेबल उमेश शेरकर यांनी शर्थीचे प्रयत्न करून कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व प्रार्थनास्थळा मधील मौलवी ,इमाम, विश्वस्त मुस्लिम समजतील जेष्ठ नागरीक सामाजिक कार्यकर्ते यांच्या वेळो वेळी बैठका घेऊन त्यांना उच्च न्यालायच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले तसेच आवाजाची पातळी किती ठेवायची आणि लाऊडस्पीकर वर कोणत्या काळात बंदी आहे. त्या नंतर अनेक मत प्रवाहतून अखेर सकाळच्या सत्रातील भोंगे बंद करण्याचा निर्णय सर्वांनी घेतला .
त्याच प्रमाणे तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुप्तवार्ता विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय गव्हाणे ,पोलीस कॉन्स्टेबल तन्वीर शेख,पोलीस कॉन्स्टेबल संतोष मगर यांनी तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व प्रार्थनास्थळा मधील मौलवी ,इमाम, विश्वस्त मुस्लिम समजतील जेष्ठ नागरीक सामाजिक कार्यकर्ते यांच्या वेळो वेळी बैठका घेऊन त्यांना उच्च न्यालायच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले त्यांच्या या प्रयत्नाला पण मोठे यश मिळाले असून तोफखाना हद्दीतील प्रार्थनास्थळा वरील पहाटेचे अजान लाऊडस्पीकरवर न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याच प्रमाणे भिंगार, एमआयडीसी आणि तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस प्रधासनाने आणि मुस्लिम बांधवांनी सामंजस्याने सकाळचे भोंगे बंद करण्याचा निर्णय घेतलाय.
पोलिसांनी हे करत असताना रात्रीची गस्त चालूच ठेवले होती पहाटे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी प्रार्थना स्थळा जवळ उपस्थित राहून भोंगे वाजतात का नाही याची शहानिशा करत होते एक दोन ठिकाणी नकळत रोजच्या सवाई प्रमाणे लाऊडस्पीकर सुरू झाला होता मात्र त्वरित पोलिसांनी त्या ठिकाणच्या उपस्थित नागरिकांना सूचना देऊन समज दिल्याने शंभर टक्के भोंगे बंद करण्याचे श्रेय पोलिसांचे आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील आपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल, शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी वेळोवेळी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन आणि सुचना केल्या त्यामुळे कुठेही अनुचीत प्रकार न घडता गोंधळ गडबड न होता नगर शहरात सकाळचे भोंगे बंद झाले असून महाराष्ट्रात नगर शहरा सह जिल्ह्य पोलीस दल आणि मुस्लिम बांधवांनी सर्वधर्मसमभाव कशा प्रकारे टिकवता येतो याचे उदाहरण दाखवून दिले आहे.