मुंबई दि २६ एप्रिल
शिवसेनेविरुद्ध आक्रमक आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मातोश्री आणि शिवसेनाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा आग्रह धरला होता. यावर आत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भाष्य केलंय.
राज्यात नुकतेच शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ,महावीर जयंती, गुढीपाडवा ,रामनवमी, हनुमान जयंती, कार्यक्रम झाले असताना आणि मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान सण सुरू असताना आपण एकमेकांना शुभेच्छा देऊन सर्व सणांचा आनंद द्विगुणीत करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. मात्र मुंबई सारख्या आर्थिक राजधानी असलेल्या शहरात बाहेरून येऊन कोणी जर राजकारण करत असेल तर हे चुकीचे असून जातीपातीच्या आणि नात्यागोत्याचा राजकारणामुळे भारत देश आणि महाराष्ट्र कधी कधीही पुढे जाऊ शकणार नाही त्यामुळे हे राजकारण थांबवा असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणा दाम्पत्याचं नाव न घेता ठणकावून सांगितल आहे.
आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मातोश्री आणि शिवसेनाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतर शिवसेनाही त्यांच्याविरोधात चांगली
आक्रमक झाल्याचे दिसून आले. शिवसेनेकडू राणा कुटुंबियांच्या घरावर आक्रमक आंदोलन करण्यात आले. याच दरम्यान राणा कुटुंबियांनी राज्याचा आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान केला आसल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झाली होती.
दरम्यान, यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित
पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.