Homeशहरसत्ताधारी शिवसेना राष्ट्रवादी पालिकेला ओरबाडण्यात व्यस्त; एक वर्षात नवीन झालेले करोडो रुपयांचे...

सत्ताधारी शिवसेना राष्ट्रवादी पालिकेला ओरबाडण्यात व्यस्त; एक वर्षात नवीन झालेले करोडो रुपयांचे शहरातील रस्ते खराब याला जबाबदार असणाऱ्या बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा नितीन भुतारे यांची मागणी.

advertisement

अहमदनगर दि.२० सप्टेंबर

अहमदनगर शहरात मागील एक ते दीड वर्षापासून झालेले अनेक रस्ते नव्याने कामे होऊन देखील एक वर्षाच्या आत खराब होताना दिसत आहेत त्याच्यावर मोठे मोठे खड्डे पडून लोकांना चालता देखील येत नाही आधीच खड्ड्यांनी हैराण झालेले नागरिक नवीन रस्त्यांवरून सुद्धा खड्ड्यांवरच वरून जात आहे हे दिसत आहेत नवीन झालेले रस्ते अनेक ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून पुन्हा खोदले गेले हे सुद्धा चित्र दिसत आहे त्यामुळे जनतेचा करोडो रुपयांचा कर भरलेला कर हा वाया जात असून याला सर्वस्वी या निष्कृष्ट कामाला जबाबदार बांधकाम विभागाचे शहर अभियंता तसेच त्यांच्याबरोबर असणारे इतर अभियंता जबाबदार आहेत असा आरोप मनसेचे नितीन भुतारे यांनी केला आहे.

नगर शहरातील नव्याने झालेला तारकपूर ते गंगा उद्या न रोड तसेच जुने जूने जिल्हाधिकारी कार्यालय समोरील एक रोड मधील अंतर्गत रस्ते भोसले आखाडा या काँक्रिट रस्ते भागातील रस्ते जुना मंगळवार बाजार येथील होसिंग हॉस्पिटल समोरील रस्ता पांचपिर चावडी येथील रस्ता व असे नगर शहरातील अनेक भागातील शहरातील रस्ते हे खराब झालेले असून याला सर्वस्वी जबाबदार आहे बांधकाम विभागातील अधिकारी आहेत एक वर्षाच्या आत इतके पैसे खर्च करून जर रस्ते खराब होत असतील तर असे रस्ते करतातच कशाला असा देखील सवाल मनसेचे नितीन भुतारे यांनी केला आहे.

त्यामुळे लोकांनी कर भरून जो पैसा महापालिकेत जमा केला जातो तो अशा प्रकारे लुटण्याचा प्रकार अधिकारी व ठेकेदार करत आहेत हे सुद्धा त्यांनी दाखवून दिले आहे वारंवार असे खराब रस्ते करणाऱ्या ठेकेदारांना पुन्हा पुन्हा कॉन्ट्रॅक्ट दिले जातात याचा अर्थ म्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचा प्रकार महानगरपालिका करत आहे हे यातून दिसून येते त्यामुळे या संपूर्ण रस्त्यांची शहरातील रस्त्यांची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर समिती नेमणूक कारवाई करावी अशी मागणी मनसेचे नितीन भुतारे यांनी केली आहे.

जे रस्ते खराब झालेत तेथील नागरिकांना तूम्ही पाणी रस्त्यांवर सोडता म्हणुन रस्त्यांवर खड्डे पडून रस्ते खराब झाले आहेत अशी नोटीस बजावण्यात आली आहे हा जावई शोध लावून महानगरपालिकेचे अभियंता जवाबदारी ढकलण्याचे दिसुन येत आहे. रस्त्यांवर पाणी पडल्यामुळे जर रस्त्ते खराब होत असतील तर पुण्या मुंबईचे रस्ते पावसाळ्यात पाणी साचून पण टिकतात हे बांधकाम विभागातील शहर अभियंता, ईतर अधिकाऱ्यांना माहित होणे गरजेचे आहे. टक्केवारीच्या भ्रष्टाचारामध्ये असे रस्ते नगर शहरामध्ये होतात त्याला सर्वस्वी जबाबदार टक्केवारी ला जबाबदार अधिकारी व सत्ताधारी पदाधिकारी व इतर सर्व लोकप्रतिनिधी असल्यामुळे हा सर्व प्रकार भ्रष्टाचाराचा दिसून येतो असा आरोप मनसेचे नितीन भुतारे यांनी केला आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular