Homeशहरमहात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्या बरोबरच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा...

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्या बरोबरच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारणार – आ. संग्राम जगताप

advertisement

अहमदनगर दि.१३ नोव्हेंबर –

शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्ण कृती पुतळा उभारण्या संदर्भात अहमदनगर महानगरपालिकेत बैठक संपन्न झाली सदरची बैठक आ.संग्राम जगताप व मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी उपमहापौर गणेश भोसले, मा.उपमहापौर अनिल बोरुडे, माणिकराव विधाते, अशोक कानडे, अंबादास गारुडकर, अशोक गोरे, डॉ.योगेश चिपडे, सचिन गुलदगड, दीपक खेडकर, रेणुका पुंड, श्वेता शिंदे, श्री.सुडके, अमित खामकर, गणेश बोरुडे, किरण जावळे, ऋषिकेश ताठे, आकाश डागवाले, संतोष हजारे, विश्वास शिंदे, विक्रम बोरुडे, ऋषिकेश इवळे, अमित गाडळकर, मळू गाडळकर, किरण मेहत्रे, संकेत लोंढे, गणेश सुडके, राहुल बोरुडे, अजय औसरकर, राहुल रासकर,संतोष हजारे आदी समाजबांधव उपस्थित होते.


यावेळी बोलताना आ.संग्राम जगताप म्हणाले की, मा.आमदार अरुणकाका जगताप यांनी महापालिकेच्या बजेटमध्ये महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा उभारण्यासाठी महापालिकेच्या आर्थिक बजेटमध्ये तरतूद केली होती त्यास मुहूर्तमेढ स्वरूप प्राप्त झाले. पक्ष, विचार, राजकारण न करता सर्वांनी एकत्रित येऊन महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्ण कृती पुतळा उभारण्या संदर्भात कमिटी स्थापन करून आयुक्तांकडे सदर अहवाल सादर करावा त्यानुसार या पुताळा उभारण्याच्या कामाला गती देऊ, पुतळा उभारण्यासंदर्भाची मंजुरी व निधी संदर्भाची जबाबदारी माझी राहील, लवकरच आर्किटेकची नेमणूक करू. महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा नगर शहराला एक इतिहास लाभला आहे कमिटीचा निर्णय अंतिम राहीन असे ते म्हणाले.

ज्येष्ठ नेते अशोक कानडे म्हणाले की, पूर्ण कृती पुतळा उभारणीसाठी सर्व समाज बांधवांनी एकत्रित यावे, आ.संग्राम जगताप यांनी पूतूळा उभारण्याचा घेतलेल्या निर्णय चांगला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शेजारीच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारणे तितकेच गरजेचे आहे. माळीवाडा वेशीला ऐतिहासिक वारसा आहे त्याचे देखील सुशोभीकरण करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
अंबादास गारुडकर म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला शिवजयंती उत्सव सुरू केला होता. त्यांची समाधी देखील त्यांनी शोधून काढली होती असे इतिहासात नमूद आहे याच इतिहासाचे चित्र उड्डाण पुलाच्या काही पिलरवर रेखाटावे असे ते म्हणाले.झालेल्या बैठकीत विविध समाज बांधवांनी आपली मते व्यक्त केली.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular