अहमदनगर दि.१४ जून
अहमदनगर मनपाच्या जन्म मृत्यू नोंद विभागात जुने रजिस्टर कुजलेल्या अवस्थेत झाले असल्याने त्या रजिस्टर मधील नोंदी काही दिवसांनी नष्ट होण्याची भीती असून या नोंदी आत्ता पासुनच संगणकात फिट करून घेतल्यास नागरिकांचा आणि मनपा कर्मचाऱ्यांचा भविष्यतील त्रास वाचेल त्या साठी मनपा प्रशासनाने त्वरित दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून या कामास सुरुवात करावी अशी मागणी शिवसेनेचे सावेडी विभाग प्रमुख चंद्रकांत (काका) शेळके यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्या कडे निवेदना द्वारे केली आहे.