अहमदनगर दि.२५ जुलै :
अहमदनगर महानगर पालिकेच्या आयुक्तपदी डॉ. पंकज जावळे यांनी पदभार स्वीकारला असून सध्या ते महानगर पालिकेच्या प्रशासनाच्या विभागांचा आढावा घेत आहेत.
नगर शहारत सध्या मुख्यप्रश्न आहे तो रस्त्यांचा मात्र महानगर पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असून विकास काम करण्यासाठी पुरेसा निधी नसल्याने आता प्रथम मनपाच्या उत्पन्नात कशी वाढ होईल या कडे मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी लक्ष केंद्रित केले आहे
मनपाच्या उतपन्न वाढ होण्यासाठी मुख्यमार्ग हा शाहरतील कर वसूली असून अनेक नागरिकांच्या मालमत्तेचा कर थकलेला आहे.सुमारे 2 कोटी 32 लाखांच्या वर कर थकबाकी असून महानगरपालिका प्रशासनाला देणं खूप आहे या सर्वांचा ताळेबंद समान करण्यासाठी आता नवीन आयुक्तांनी सर्वात प्रथम वसुलीवर भर देण्यासाठी अहमदनगर शहरातील वरदात्यांसाठी शासकीय मातीची योजना आखली असून 26 ,27 जुलै पासून नगर शहरातील नागरिकांना शस्ती माफीची योजना पुन्हा लागू होणार आहे. एक महिन्यासाठी म्हणजेच ऑगस्ट अखेर पर्यंत शास्ती माफीची योजना असून नागरिकांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा असे अवहान मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी केलं आहे.
आधी महापालिकेने ७५ टक्के शास्ती माफ करण्याची घोषणा केली होती त्यावेळी मनपा प्रशासनच्या तिजोरीत भरपूर वसूली झाली होती एकच दिवसात 40 ते 50 लाख रुपयांची वसुली झाल्याचे उदाहरण असल्याने मनपा आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.