अहमदनगर दि.२८ एप्रिल
अहमदनगर शहरातील राज चेंबर समोरील दुर्गंधीने कोंडलेला श्वास नुकताच मोकळा झाला असला तरी आताही दुर्गंधी बुऱ्हानागर रोडवर गेली असून याठिकाणी हाडा मांसा सह अख्खे जनावरे याठिकाणी टाकून देण्यात आले असल्याने या भागात एक मिनिटं सुद्धा कोणी उभा राहू शकत नाही.
रस्त्याच्या कडेलाच मेलेल्या कोंबड्या, गाय, म्हैस, टाकून देण्यात आल्या आहेत तर हॉटेल मधील उष्टे खरकटे अन्न म्हणजेच हाडांचा खच पडलेला आहे त्यामुळे या भागात दुर्गंधी पसरली असून हा मार्ग प्रसिद्ध बुऱ्हानागरच्या तुळजाभवानी मंदिराकडे जातो तसेच मिरवली पहाड ,श्रीक्षेत्र अगडगाव कडे जाणार मार्ग असून बुऱ्हानागर सह आसपासच्या गावांना जाण्यायेण्या साठी हा मार्ग अनेक लोक वापरतात.
तसेच ऐतिहासिक दमडी मस्जिद समोरच हा राडा रोडा टाकण्यात येतो त्याच बाजूला मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधवांचे कब्रस्तान आहेत तर अलीकडे प्रसिद्ध बेलेश्वर मंदिर कडे जाण्यासाठी मार्ग आहे.
हा भाग भिंगार छावणी मंडळ,नागरदेवळे, आणि महानगर पालिकेच्या सीमेवर येत असला तरी भविष्यात या राड्या मुळे रोगाची साथ पसरू शकते त्यामुळे या ठिकाणी मयत जनावरांचे अवशेष टाकणाऱ्यावर कठोर कारवाई करून येथील राडा उचलावा अशी मागणी या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे.