जालना दि.३० जुलै
अखेर शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असून याबाबत त्यांनी जालना येथे पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.या पत्रकार परिषदेच्या वेळी अर्जुन खोतकर यांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारून हा निर्णय मी घेतला असून त्यांच्या परवानगी नंतरच मी शिंदे गटात प्रवेश करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केल आहे. परिस्थितीनुसार हा निर्णय घेतोय असंही अर्जुन खोतकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
अर्जुन खोतकर आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार रावसाहेब दानवे यांचे वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. मात्र तीन वर्षानंतर अर्जुन खोतकर आणि खासदार दानवे यांचे संभाषण झाले. दिल्लीला खोतकर आणि दानवे यांची भेट ही झाली यावेळी जालन्याची खासदारकीचे तिकीट पुढच्या वेळेस मला द्यावे अशी मागणी ही अर्जुन खोतकर यांनी केली असल्याचं सांगितल आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घ्यावा असंही यावेळी पत्रकार परिषद बोलताना अजून खोतकर यांनी सांगितले.