मुंबई दि.२ जुलै
दोन दिवसांपूर्वीचा राज्यात मोठं सत्तांतर पार पडलंय. या सत्तातरानंतर नव्या मंत्रिमंडळासाठीही लगबग सुरू आहेत. राज्यात अनेक आमदार हे नव्या मंत्रिमंडळात बसण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर शिंदे गटातील दोन नेत्यांची केंद्रातही मंत्रिपदी वर्णी लागणार आहे. शिवसेना आणि भाजपची युती होती तेव्हा शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी तयार झाल्याने अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला होता.
मात्र आता शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजपचं सरकार राज्यात स्थापन झाल्याने या गटाला दोन मंत्रिपद केंद्रात मिळणार आहेत. या दोन्ही मंत्रिपदासाठी जी नावं चर्चेत आहेत. ते एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खा. श्रीकांत शिंदे आणि विदर्भातील एका खासदार असं नाव आहे चर्चेत आहे मात्र यावर शिक्का मूर्त कधी होईल हे सांगता येणार नाही तसेच बंडाच्या मधल्या काळात महत्व्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या दीपक केसरकर यांच्यावरही मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे.