HomeUncategorizedछत्रपती संभाजीराजे यांना तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात जाण्यापासून अडवणे म्हणजे चालत आलेल्या परंपरेला आव्हान...

छत्रपती संभाजीराजे यांना तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात जाण्यापासून अडवणे म्हणजे चालत आलेल्या परंपरेला आव्हान देणे- तुळजाभवानी पालखीचे मुख्य मानकरी ॲड. अभिषेक विजय भगत

advertisement

तुळजापूर दि.११

खा. छत्रपती संभाजीराजे सध्या उस्मानबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मंगळवारी संभाजीराजे हे तुळजाभवानी मंदिरात गेले, मात्र त्यावेळी त्यांना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्याचा प्रकार घडला. या प्रकारामुळे तुळजापुरात एकच खळबळ उडाली. छत्रपती घराण्यातील सदस्याला गाभाऱ्यात जाण्याची परवानगी आहे. परंपरेनुसार छत्रपती घराण्यातील सदस्याला मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी कोणाची अनुमती लागत नाही, अशी शेकडो वर्षांची परंपरा आहे. तरीही रोखल्याने दर्शनास आलेले संभाजीराजे देखील संतापले होते. त्यानंतर त्यांनी कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थानने दिलगिरी व्यक्त केली होती.

या प्रकारा नंतर राज्यभरातून तुळजापूर संस्थाना बद्दल निषेध व्यक्त करण्यात आला अहमदनगर मधील बुऱ्हाणनगर येथील -जगदंबा तुळजाभवानी मंदिर देव्हाराचे प्रमुख आणि तुळजापूरच्या तुळजाभवानी पालखीचे मुख्य मानकरी ॲड. अभिषेक विजय भगत यांनी मंगळवारी घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे प्रशासनाने पिढ्यान पिढ्या तुळजाभवानी आईची सेवा करणाऱ्या घराण्यांना / मानकरी /सेवेकरी यांना कुलाचार ,दर्शन व विधी परंपरेनुसार करण्यास कोणतीही अडचण न आणता त्यांना साहाय्य करावे असे आवाहन त्यांनी संस्थानला केले आहे.

तर आता या प्रकरणावर आता मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेत उद्या तुळजापूरची बंदची हाक दिली आहे. त्यामुळे तुळजापुरातील वातावरण आणखी तापले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular