अहमदनगर दि २१ एप्रिल
अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठेतील कापड बाजार, मोची गल्ली, सारडा गल्ली, गंज बाजार, शहाजी भोसले रस्ता या भागात सार्वजनिक रस्त्यांचा दुरुपयोग करून अतिक्रमण करणाऱ्या हातगाडी धारक व पथारीवाले यांच्या विरुद्ध कायमस्वरूपी ठोस कारवाई होण्यासाठी तसेच या विरुद्ध अहमदनगर व्यापारी महासंघाच्या माध्यमातून आवाज उठविल्याने व व्यापाऱ्यांवर होणारे हल्ले व अन्याय आणि व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचा सध्या प्रयत्न होत असल्याने हा सर्व प्रकार थांबवावा आशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खा. सुप्रियाताई सुळे यांना अहमदनगर व्यापारी महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आलंय.
शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये काय दिवसांपूर्वी एका व्यापारी आणि पाथरी वाल्याचे भांडण झाल्यानंतर अतिक्रमण धारकांचा प्रश्न समोर आला होता अतिक्रमणे काढावे यासाठी व्यापारी महासंघाने आंदोलन करून उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता मात्र महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी उपोषणकर्त्यांना शहरातील मुख्य बाजारपेठेतील सार्वजनिक रस्त्यांचा दुरुपयोग करून अतिक्रमण करून रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या तसेच बाजारपेठेत येणाऱ्या महिलांची छेड काढत ग्राहकांना अरे-रावी करणाऱ्या हातगाडी धारक व पथारीवाले यांच्याविरुद्ध अव्याहतपणे निरंतर व सातत्यपूर्ण कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले होते काही दिवस ही कारवाई झाली मात्र या कारवाईत सत्यता नासल्याने आणि ही कारवाई ही केवळ सकाळच्या वेळीच होत असून महानगरपालिकेच्या सुट्टीच्या दिवशी अगर सायंकाळच्या वेळी सदर कारवाई होत नसल्याने या संधीचा फायदा घेऊन मुख्य बाजारपेठेत हातगाडी धारक व पाथरी वाले पुन्हा सार्वजनिक रस्त्यांचा दुरुपयोग करून अतिक्रमण करत आपापला व्यवसाय थाटतात व या माध्यमातून रहदारीला मोठ्याप्रमाणावर अडचण निर्माण होऊन ट्राफिक जॅम च्या समस्या ही सातत्याने उद्भवत आहेत.
त्याचप्रमाणे कारवाई करण्याकरिता आलेले अतिक्रमण निर्मूलन पथक माघारी वळल्या बरोबर त्यांची पाठ वळताच त्याच ठिकाणी पुन्हा सदर अतिक्रमण धारक आपला व्यवसाय थाटतात. या संपूर्ण प्रक्रियेत व्यापारी, कामगार व ग्राहक हा नाहक भरडला जाऊन मनपा द्वारे केलेल्या कारवाईचे अर्थच राहत नाही व पुन्हा एकदा सदर बाजारपेठेचा श्वास अतिक्रमण ग्रस्त झाल्याने कोंडला जातो.
सदर सर्व त्रासाला कंटाळून अहमदनगर व्यापारी महासंघाने सर्व व्यापारी बंधूंच्या माध्यमातून संघर्ष करत आंदोलन पुकारल्याने काही समाजकंटकांनी सदर आंदोलना करिता पुढाकार घेणाऱ्या अमदनगर व्यापारी महासंघाच्या पदाधिकारी व व्यापाऱ्यांना धमकावण्याचे, त्यांचा पाठलाग करून दहशत निर्माण करण्याचे, बाजारपेठेत त्यांच्यापुढे उभे राहून वेड्या वाकड्या नजरेने पाहून अर्वाच्च भाषेचा वापर करणे तसेच चुकीचे व खोट्या प्रकारचे आरोप करत त्यांच्या बरोबर वाद घालणे तसेच त्यांच्या बांधकामाबाबत खोटी माहिती पुरवून त्यांना ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने व त्यांचा आवाज क्षमविण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर खोटेनाटे स्वरूपाचे चुकीचे व लबाडीचे आरोप करण्याचे घाट घालत आहेत असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या व्यपाऱ्यांच्या प्रश्नात जातीने लक्ष घालून व्यापाऱ्यांच्या बाजूने उभे राहून व सदर संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून व्यापाऱ्यांना कायमस्वरूपी सदर जाचातून, त्रासातून मुक्ती मिळेल अशा पद्धतीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन कायमस्वरूपी ठोस कारवाई अशी मागणीही अहमदनगर व्यापारी महासंघाने केली आहे.