अहमदनगर दि.६ सप्टेंबर
मुसळधार पावसाने अहमदनगर शहराची दैना उडून टाकली आहे. अहमदनगर शहरात (ahmednager city)ठीक ठिकाणी खड्डे (Potholes) झाले असून त्यामुळे अनेक नागरिकांना या खड्ड्यांमुळे जायबंदी व्हावे लागत आहे. मात्र महानगरपालिका प्रशासन पावसाळ्यातच रस्ता डांबरी (Streams Asphalting) करण्याचा घाट घालत असल्यामुळे हे खड्डे कधीच बुजलेले दिसत नाहीत. पावसाचा आणि डांबराचा 36 चा आकडा असतो हे बहुतेक महानगरपालिकेच्या प्रशासनाला कधीच कळले नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या आधीच नगर शहरातील डांबरी रस्ते करण्याचा घाट महानगरपालिका प्रशासन करत असते. आणि पहिल्याच पावसात सर्व रस्ते पुन्हा जैसे होत असतात त्यामुळे नगरकरांना खड्ड्यांच्या रस्त्याची सवय झाली आहे.
या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत याकडे महानगरपालिका प्रशासन( Municipal administration) कधीही लक्ष देत नाही. उघड्या गटारी आणि खड्डे यामुळे नागरिकांचे अपघात होतात मात्र महानगरपालिका याबाबत कोणतीही ठोस पावले कधीच उचलताना दिसत नाही हे अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रशासनाचे वैशिष्ट्य आहे.
गुलमोहर रोड जवळील पारिजातक चौकाजवळील कोहिनूर मंगल कार्यालयासमोरील एका उड्या गटारीमुळे एका माणसाचा जीव जाता जाता वाचला सायंकाळी झालेल्या प्रचंड पावसामुळे आणि बुजवलेल्या ओढ्यांमुळे छोट्या छोट्या नाल्या तुडुंब भरून वाहत होत्या आणि त्याच वेळेस एक नागरिक नेहमीच्या रस्त्याने सवाई प्रमाणे दुकानाजवळ गेला असता तो थेट उघड्या गटारीमध्ये पडला मात्र दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात त्याचे प्राण बचावले अन्यथा मोठे संकट आज त्या सामान्य माणसावर आले होते. मात्र असे अनेक प्रसंग रोज नगरमध्ये खड्ड्यांमुळे घडत असतात मात्र महानगरपालिका काहीच करत नाही.थंड नगरकर आणि बेफिकीर मनपा प्रशासन या मुळे भविष्यात खड्डे बुजतील असे वाटत नाही.
पहा व्हिडीओ