अहमदनगर दि.२७ एप्रिल
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान’ पुरस्कार प्राप्त अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या दालना जवळ असलेली नूतन इमारतीची काच फुटली असून या इमारतीचे उदघाटन होऊन जेमतेम सहा महिनेही झले नाही तोच इमारतीची काच फुटली आहे
राज्यात सर्वात मोठे प्रशासकीय इमारतीचा बहुमान अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने पटकावले आहे अत्यंत देखणी आणि सुंदर रंगरंगोटी तसेच बाहेरील परिसर अत्यंत चांगला सुशोभित केल्याने ही इमारत अत्यंत सुंदर दिसते मात्र पहिल्या मजल्यावरील ज्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांचे दालन आहे त्या परिसरात काच फुटल्याने इमारतींच्या सौंदर्याला कुठेतरी तडा गेल्याचे दिसून येत आहे.